शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नाशकात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:15 PM

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिक शहरात शोभायात्रा काढून जागतिक कृषी महोत्सवास प्रारंभ झाला. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन या प्रदशर्नाचे उद्घाटन झाले. तत्पुर्वी सेवेकऱ्यांनी शहरातून पारंपारिक वेशभूषा करून बैलगाडीसह हातात ध्वज घेऊन शोभायात्रेत सहभाह घेतला होता.

नाशिक : नव्या युगाचे नवे आव्हान पेलण्यासाठी तरुण शेतकऱ्यांना कृषिविषयक तंत्रशुद्ध ज्ञानाची शिदोरी देण्याची गरज असून, देशातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर गुरुवारी (दि.२३) उद्घाटन झाले, त्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी गोदावरी नदी काठावर गंगापूजन करून मालेगाव स्टॅण्ड, घारपुरे घाट, गंगापूररोडमार्गे शोभायात्रा काढून सेवेकरी डोंगरे मैदानावर दाखल झाल्यानंतर जानोरी येथील शेतकरी सुनील तिडके यांच्या हस्ते सपत्निक मातीपूजन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, गणपत गायकवाड, केव्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, अर्थतज्ज्ञ नामदेव जाधव, नगरसेवक वत्सला खैरे, स्वाती भामरे, नितीन मोरे, चंद्र्रकांत मोरे, आबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.  

गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले, कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयी, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती व मार्गदर्शनासोबत कृषीतील ऋषी संस्कृतीविषयीही ज्ञानाची शिदोरी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून शेतकरी आत्महत्या कमी करणे शक्य असल्याचे सांगितले. डॉ. सुधीर तांबे यांनी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाने कृषी व अध्यात्माचे धडे सर्वसामान्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवून आजच्या युवा, तरुण पिढीला योग्य दिशा दिल्याचे मत व्यक्त केले. विभागीय कृषी संचालक संजीव पडवळ, आत्मा केंद्राचे हेमंत काळे, कैलास शिरसाठ, प्रतिभा भदाने, मधुकर जाधव यांच्यासह शेतकरी व सेवेकरी उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकDevyani Farandeदेवयानी फरांदे