शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:12 IST

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे.

सायखेडा : काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या अनास्थेमुळे भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक हे नगदी पीक म्हणून शेतकरी आपल्या शेतात करतात, कमी कालावधीत चार पैसे हातात पडतील या आशेने ऐन उन्हाळ्यात भाजीपाला चांगल्या भावात विकला जाईल या आशेवर असलेल्या शेतक ºयाची गडगडणाºया भावामुळे मोठे नुकसान होत आहे. गोदाकाठ भागात अनेक शेतकºयांनी शेतात भाजीपाला पिकवला असून, आज भाव मिळत नसल्याने शेतात सोडून द्यावा लागत आहे. एका हंगामात दर नाही मिळाला तर दुसºया हंगामात तो भरून निघेल या आशेने शेतात केलेला भाजीपाला काढणीसाठी परवड नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला म्हणून गोदाकाठची ओळख झाली आहे. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी यामुळे उन्हाळ्यातदेखील शेतात पीक चांगले येते, शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पीक करत नाही. भाजीपाल्याचा तुटवडा येऊन बाजारभाव चांगला मिळेल या आशेवर शेतकरी रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करत असतात. भाव कमी मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला मार्केट अथवा आठवडे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे बंद केले आहे. भाजीपाला काढणे आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे हा खर्च वसूल होत नसल्याने शेतीतून भाजीपाला काढणे शेतकºयांनी बंद केले आहेशेतीची मशागत, रोपे, खते, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, मजुरी, असे लाखो रुपये भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमालाला निर्धारित मूल्य असल्यास शेती तोट्यात जाणार नाही शेतमालातून किमान शेतकºयाला प्रपंच चालविण्यासाठी चार पैसे मिळाले पाहिजे, झालेला खर्च किमान वसूल झाला पाहिजे, असे हमीभाव असले पाहिजे तरच शेतकरी वाचेल अन्यथा वाढते कर्ज, व्याज, मुलांचे शिक्षण, लग्न या सर्व गरजा शेतकरी कशा पद्धतीने पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.हमीभावाकडे दुर्लक्षशेतमाल परवडत नाही त्यामुळे हमीभाव मिळाला पाहिजे, अशी केवळ चर्चाच ऐकायला मिळते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयत्न करण्यासाठी कोणीही फारसा इच्छुक दिसत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. कोणीच या संदर्भात सरकारला धारेवर धरत नाही. केवळ शेतकरी संघटनेच्या अजेंट्याचा विषय असल्याने हमीभावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींची उदासीनता पहायला मिळते.प्रचंड मेहनत करून भाजीपाला पिकवला, कर्ज काढून, उसनवारी करून भांडवल खर्च केले. आज फ्लॉवर आणि कोबीला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले तर कोणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे, अशा काळात आम्ही शेतकºयांनी प्रपंच कसा चालवायचा, कुटुंब चालविण्यासाठी खर्च येतो तो कसा भागवायचा, शेतकरी आर्थिक परिस्थिती खचला जात आहे आता सरकारने आम्ही कसे जगावे याचा सल्ला घ्यावा ही विनंती आहे.- शांताराम हांडगे, शेतकरी, चाटोरी

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या