शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:12 IST

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे.

सायखेडा : काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या अनास्थेमुळे भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक हे नगदी पीक म्हणून शेतकरी आपल्या शेतात करतात, कमी कालावधीत चार पैसे हातात पडतील या आशेने ऐन उन्हाळ्यात भाजीपाला चांगल्या भावात विकला जाईल या आशेवर असलेल्या शेतक ºयाची गडगडणाºया भावामुळे मोठे नुकसान होत आहे. गोदाकाठ भागात अनेक शेतकºयांनी शेतात भाजीपाला पिकवला असून, आज भाव मिळत नसल्याने शेतात सोडून द्यावा लागत आहे. एका हंगामात दर नाही मिळाला तर दुसºया हंगामात तो भरून निघेल या आशेने शेतात केलेला भाजीपाला काढणीसाठी परवड नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला म्हणून गोदाकाठची ओळख झाली आहे. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी यामुळे उन्हाळ्यातदेखील शेतात पीक चांगले येते, शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पीक करत नाही. भाजीपाल्याचा तुटवडा येऊन बाजारभाव चांगला मिळेल या आशेवर शेतकरी रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करत असतात. भाव कमी मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला मार्केट अथवा आठवडे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे बंद केले आहे. भाजीपाला काढणे आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे हा खर्च वसूल होत नसल्याने शेतीतून भाजीपाला काढणे शेतकºयांनी बंद केले आहेशेतीची मशागत, रोपे, खते, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, मजुरी, असे लाखो रुपये भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमालाला निर्धारित मूल्य असल्यास शेती तोट्यात जाणार नाही शेतमालातून किमान शेतकºयाला प्रपंच चालविण्यासाठी चार पैसे मिळाले पाहिजे, झालेला खर्च किमान वसूल झाला पाहिजे, असे हमीभाव असले पाहिजे तरच शेतकरी वाचेल अन्यथा वाढते कर्ज, व्याज, मुलांचे शिक्षण, लग्न या सर्व गरजा शेतकरी कशा पद्धतीने पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.हमीभावाकडे दुर्लक्षशेतमाल परवडत नाही त्यामुळे हमीभाव मिळाला पाहिजे, अशी केवळ चर्चाच ऐकायला मिळते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयत्न करण्यासाठी कोणीही फारसा इच्छुक दिसत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. कोणीच या संदर्भात सरकारला धारेवर धरत नाही. केवळ शेतकरी संघटनेच्या अजेंट्याचा विषय असल्याने हमीभावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींची उदासीनता पहायला मिळते.प्रचंड मेहनत करून भाजीपाला पिकवला, कर्ज काढून, उसनवारी करून भांडवल खर्च केले. आज फ्लॉवर आणि कोबीला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले तर कोणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे, अशा काळात आम्ही शेतकºयांनी प्रपंच कसा चालवायचा, कुटुंब चालविण्यासाठी खर्च येतो तो कसा भागवायचा, शेतकरी आर्थिक परिस्थिती खचला जात आहे आता सरकारने आम्ही कसे जगावे याचा सल्ला घ्यावा ही विनंती आहे.- शांताराम हांडगे, शेतकरी, चाटोरी

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या