शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दहा तासांच्या परिश्रमानंतर जलवाहिनी दुरुस्त; महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश 

By suyog.joshi | Updated: June 18, 2024 17:04 IST

मंगळवारी (दि.१८) कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असून सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु होईल.

नाशिक (सुयोग जोशी) : नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी गंगापूर धरणातील थेट जलवाहिनी दहा तासांच्या परिश्रमानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सोमवारी रात्री उशिराने दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे धुव्रनगर, रामराज्य, नहुष,बळवंत नगर, गणेशनगर येथील जलकुंभावाद्वारे सातपूर व नाशिक पश्चिमला होणारा पाणी पुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी (दि.१८) कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असून सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु होईल. शहराचा नव्वद टक्के पाणी पुरवठा हा गंगापूर धरणातून होतो. 

गंगापूर धरणातून पाईपलाईनद्वारे शिवाजीनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी नेले जाते. तेथे शुध्दीकरण प्रक्रिया करुन ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र सोमवारी सकाळी मोतीवाला काॅलेज येथे जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहरातील काही भागांचा होणारा पाणी पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाकडून तत्काळ दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आले. या जलवाहिनीद्वारे पंचवटी, नाशिक पश्चिम,सातपूर या भागांमध्ये पाणी पुरवठा होतो. शहरातील १२० पैकी पाच जलकुंभाद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद होता. त्यामध्ये प्रामुख्याने सातपूर व नाशिक पश्चिम विभागातील नागरिकांना पाणीबाणीला तोंड द्यावे लागले. दरम्यान पाणी पुरवठा विभागाच्या पथकाकडून रात्री उशीरापर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु होते. दहा तासांच्या प्रयत्नानंतर गळती बंद करण्यात यश आले.

महानगरपालिकेने तातडीने पंपिंग बंद करून लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशीरा गळती बंद करण्यात यश आले. मंगळवार सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. - रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात