शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

आंबेडकरांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: December 6, 2015 22:11 IST

गंगाधर अहिरे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

नाशिक : देशातील बिघडलेली सामाजिक स्थिती बघता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. केवळ त्यांच्या बाबतीतील वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकारण्यांनी त्यांचे विचार अवगत करावेत, असे प्रतिपादन प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले. श्रमिकनगर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा. अहिरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी १९५४ साली बहिष्कृत हितकारण सभा स्थापन करून त्यात ३० कलमांचा समावेश केला. यामध्ये देशाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच बाबींचा समावेश होता. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाने डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव पटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान तिवडे, सुधीर काळे, रोहित गांगुर्डे, अ‍ॅड. बनसोड, विजय गायकवाड, अशोक बनकर आदि उपस्थित होते. जगन्नाथ भरीत यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक चंद्रमणी इंगळे, तर संतोष पेंढारकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय भरीत, यशवंत भवरे, रूपराव तायडे, सतीश खिल्लारे, किशोर तायडे, मनोज पगारे, दामोदर गायकवाड, ईश्वर जाधव आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)