शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

वडाळागाव परिसरात अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:48 PM

वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील गल्लीबोळातून बेफान वेगाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना लगाम बसवावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. दुर्घटना झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागांना जाग येणार का? असा सवाल नागरिक केला आहे.वडाळागाव शेतकरी आणि कामगार वस्ती म्हणून ओळखली जात, सुमारे १२ हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जिनतनगर, पिंगुळी बाग, यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव करतात. त्यांना कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी बससेवेअभावी रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यासाठी नागरिकांना मांगीरबाबा चौक येथून रिक्षात बसावे लागते. सदर रिक्षा हनुमान मंदिर खंडोबा चौक यामार्गे गल्लीबोळातून मार्गक्र मण बेफान वेगाने आणि अवैध प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. सदर रिक्षाचालकांना भान नसते की, आपण गल्ली बोळातून वाहन चालवत आहे. त्यामुळे लहान मुलांची अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने गल्लीबोळातून रिक्षा वाहतूक बंद करून मुख्य रस्त्यांनी आणि वेगमर्यादेचे भान ठेवून रिक्षाचालकांना वाहतूक करण्याची शिस्त लावावी तसेच बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.वडाळागावात अद्यापही शहर वाहतूक बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील नागरिकांना रिक्षांनी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सिटांवर सहा ते सात आणि रिक्षाचालकाशेजारी तीन ते चार प्रवासी बसलेले असतात रिक्षाचालकांकडे वाहन परवाना आणि गणवेश नसल्याचे नागरिकांची तक्र ार आहे. तसेच शंभरफुटी रस्त्यावर मांगिरबाबा चौकात दुतर्फा रस्त्यावर रिक्षा उभा करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीNashikनाशिक