शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दुर्घटना घडूनही दुर्लक्षच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:48 IST

रस्ता अपघाताच्या बाबतीत जनजागरण करण्याकरिता ‘दुर्घटना से देर भली’ अशी वाक्ये लिहिलेले फलक आपण वाचतो; पण दुर्घटना घडल्याखेरीज जागे न होण्याची सवय यंत्रणांना जडलेली असल्याने त्यांचे काय करणार, हा खरे तर प्रश्नच आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे प्राथमिक शाळा पडून जी दुर्घटना घडली ती पाहता, आपल्याकडेही तशीच वेळ ओढवण्यासारख्या ज्या शाळा इमारती आहेत त्याबद्दलची चिंता त्यामुळेच रास्त ठरावी.

साराशरस्ता अपघाताच्या बाबतीत जनजागरण करण्याकरिता ‘दुर्घटना से देर भली’ अशी वाक्ये लिहिलेले फलक आपण वाचतो; पण दुर्घटना घडल्याखेरीज जागे न होण्याची सवय यंत्रणांना जडलेली असल्याने त्यांचे काय करणार, हा खरे तर प्रश्नच आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे प्राथमिक शाळा पडून जी दुर्घटना घडली ती पाहता, आपल्याकडेही तशीच वेळ ओढवण्यासारख्या ज्या शाळा इमारती आहेत त्याबद्दलची चिंता त्यामुळेच रास्त ठरावी.जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था हा तसा न संपणारा विषय आहे. विशेषत: पावसाळ्याच्या तोंडावर त्याकडे लक्ष वेधले जाते, छप्पर नसलेल्या व पडक्या, गळक्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव दिले जातात; पण सरकारी लाल फितीचा अनुभव लक्षात घेता एकापाठोपाठ अनेक पावसाळे निघून गेल्यावरही कामे काही होत नाहीत. गेल्याच आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातील आंबोडा येथील अशीच एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पावसामुळे कोसळून तीन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याची व शिक्षकासह १४ जखमी झाल्याची घटना घडल्याने या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधले जाणे क्रमप्राप्त ठरले आहे. कारण, अप्रिय घटना घडल्याखेरीज जागचे न हलण्याची आपल्या यंत्रणांची मानसिकता बनली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोनशेपेक्षा अधिक शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आलेले होते, त्यापैकी अवघे ७२ शाळा खोल्यांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. त्यासाठी निधीही मंजूर केला गेला आहे, मात्र प्रत्यक्षात कामकाजाला म्हणजे दुरुस्तीला मुहूर्त न लाभल्याचे वर्तमान आहे. येथेही काही दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जाते आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाणे त्यामुळेच स्वाभाविक ठरले आहे. मुळात, प्राथमिक शिक्षणाकडे आयुष्याचा पाया म्हणून पाहिले जात असले तरी त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत गांभीर्यच बाळगले जात नाही. त्यातही ग्रामीण भागातील अवस्था तर अतिशय बिकट आहे. शाळा खोल्यांपासूून ते पुरेशा शिक्षकवर्गापर्यंतचे अनेक घटक त्यास कारणभूत आहेत. विशेष म्हणजे, रस्ते, बंधारे आदि. कामांसाठी आग्रही असणारे लोकप्रतिनिधी शाळांच्या इमारती वा वर्गखोल्यांच्या बांधकामांबाबत फारसे उत्साही नसतात. त्यामुळे याविषयाकडे दुर्लक्षच घडून येते, परिणामी आंबोडा येथे घडलेल्या घटनेसारख्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येते. आश्चर्य याचे की, ज्या काही वर्गखोल्यांचे काम मंजूर आहे व निधीही उपलब्ध आहे, ते का सुरू होऊ शकले नाही याचे कोणतेही समाधानकारक उत्तर संबंधितांकडे नाही. जिल्हा परिषदेच्या गेल्या वर्षीच्या एका सर्वसाधारण सभेत वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी करीत काही जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्षांसमोर जमिनीवर बसून आंदोलन केले होते; पण त्याही ठिकाणची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. यंदा तर तशीही निधीत कपात करण्यात आली आहे. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती आहे. त्यात पाऊस बºयापैकी होतो आहे. अशा स्थितीत पडक्या शाळांची दुरुस्ती प्राथमिकतेने व तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु यंत्रणांना त्याचे गांभीर्यच नसल्याचे चित्र आहे. शासनाचे सर्वशिक्षा अभियान हे केवळ उपक्रमांपुरते उरले असून, शाळांच्या इमारत निर्मिती व दुरुस्तीबाबत शिक्षण विभागही आग्रही भूमिका घेताना दिसत नाही. पडक्या शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन बसणाºया व उद्याच्या भारत घडवायला निघालेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाटून जाते, ती त्यामुळेच.