शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:29 IST

नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला प

ठळक मुद्देअजब फतवा : टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठी धावाधावटंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई

नाशिक : पाणी टंचाई भासत असेल तर अगोदर परिसरातील दोन किलो मीटर अंतरावर पाणी असलेल्या विहीरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाने टंचाईने त्रस्त झालेल्या गावांना दिल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात खेटा घालून दमलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी विहीरींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी खूप पाऊस झाल्याच्या आनंदात असलेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातील पाणी टंचाईकडे चालविलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला परंतु काही ठिकाणी भरपूर पाऊस पडूनही खडकाळ व मुरूमाच्या जमीनीमुळे पाऊस जमिनीत मुरू शकला नाही अशाच भागामध्ये डिसेंबर अखेर पाणी टंचाई भासू लागली आहे. येवला तालुक्यातील भारम, कोळम, कुसूमाडी, खैरगव्हाण, अहेरवाडी आदी गावांच्या विहीरींनी तळ गाठला असून, पावसाळ्यातही या गावांना पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केले, तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री करून तसे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले आहेत. असाच प्रकार बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीच्या बाबतीत झाला आहे. नद्या, नाले व विहीरी आटल्यामुळे आत्तापासूनच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनीही टॅँकरची मागणी केली आहे. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालय अजुनही जिल्ह्यात पडलेल्या १३५ टक्के पावसाच्या आनंदात मग्न असल्याने त्यांना टंचाईग्रस्त गावांची पाण्याची मागणी मान्य नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून तो परत पाठविण्यातच प्रशासन धन्यता मानत असून, परिणामी पाण्यासाठी टाहो फोडणा-या ग्रामीण जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. टॅँकर देण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये पाणी असलेल्या विहीरी शोधण्याचा अजब सल्ला प्रशासनाने दिला आहे त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिक व तहसिलदार, गटविकास अधिकारी पाण्याने भरलेल्या विहीरींच्या शोधासाठी धावाधाव करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक