शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
3
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
4
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
5
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
6
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
7
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
8
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
9
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
10
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
11
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
12
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
13
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
14
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..
15
विमानातून अचानक धूर... तुर्कीचे C-130 जॉर्जियात कोसळले; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
16
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
17
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
18
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
19
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
20
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा

पाणी टॅँकर हवे असेल तर विहीर शोधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:29 IST

नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला प

ठळक मुद्देअजब फतवा : टंचाईग्रस्त गावांची पाण्यासाठी धावाधावटंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई

नाशिक : पाणी टंचाई भासत असेल तर अगोदर परिसरातील दोन किलो मीटर अंतरावर पाणी असलेल्या विहीरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाने टंचाईने त्रस्त झालेल्या गावांना दिल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात खेटा घालून दमलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी विहीरींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी खूप पाऊस झाल्याच्या आनंदात असलेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातील पाणी टंचाईकडे चालविलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील पारंपारिक टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये डिसेंबर संपताच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, विशेषत: येवला तालुक्यातील पुर्वभाग व बागलाण तालुक्यातील दुर्गम भागाचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, काही भागात जेमतेम झालेल्या पावसाने तेव्हढ्यापुरता दिलासा दिला परंतु काही ठिकाणी भरपूर पाऊस पडूनही खडकाळ व मुरूमाच्या जमीनीमुळे पाऊस जमिनीत मुरू शकला नाही अशाच भागामध्ये डिसेंबर अखेर पाणी टंचाई भासू लागली आहे. येवला तालुक्यातील भारम, कोळम, कुसूमाडी, खैरगव्हाण, अहेरवाडी आदी गावांच्या विहीरींनी तळ गाठला असून, पावसाळ्यातही या गावांना पुरेसे पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे शेतीलाच नव्हे तर पिण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केले, तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री करून तसे प्रस्ताव जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले आहेत. असाच प्रकार बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीच्या बाबतीत झाला आहे. नद्या, नाले व विहीरी आटल्यामुळे आत्तापासूनच ग्रामस्थांना पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने त्यांनीही टॅँकरची मागणी केली आहे. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालय अजुनही जिल्ह्यात पडलेल्या १३५ टक्के पावसाच्या आनंदात मग्न असल्याने त्यांना टंचाईग्रस्त गावांची पाण्याची मागणी मान्य नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून तो परत पाठविण्यातच प्रशासन धन्यता मानत असून, परिणामी पाण्यासाठी टाहो फोडणा-या ग्रामीण जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. टॅँकर देण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये पाणी असलेल्या विहीरी शोधण्याचा अजब सल्ला प्रशासनाने दिला आहे त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील नागरिक व तहसिलदार, गटविकास अधिकारी पाण्याने भरलेल्या विहीरींच्या शोधासाठी धावाधाव करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक