शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:51 IST

विधान परिषदेच्या पराभवावर सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या नेत्यांमधील कार्यकर्ता मेला तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. नेते असाल तर नेत्यासारखे वागा, सर्वांना सामावून घ्यायला शिका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजप कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी बोलताना स्वपक्षीयांना सुनावले. अमरावतीमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी नेत्यांची कानउघाडणी केली. 

२०१४ पासून आपल्याला निवडणुका जिंकायची सवय लागली आहे. आपण एक निवडणूक हरलो तरी चर्चा होते. विदर्भातील आणि त्यातही अमरावतीतील (रणजित पाटील)  पराभवाचे आत्मचिंतन आपण केलेच पाहिजे. तीन हजार मतांनी आपला उमेदवार हरतो आणि त्या ठिकाणी सहा हजार बाद झालेली मते आपलीच असल्याचे दिसते. हे आत्मचिंतन करण्यासारखेच आहे. आपण सगळे नेते आहोत, नेत्यांनी नेत्यांसारखेच वागले पाहिजे; पण नेता हा नेताच राहिला आणि त्याच्यातील कार्यकर्ता मेला तर तो नेताही राहणार नाही. नरेंद्र मोदी हे आपले नेते आहेत; पण ते आजही संघटनेला पूर्णत: समर्पित, शरण आहेत. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. पक्षाला विचारल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. आजही  प्रचारकासारखे जीवन जगतात. 

पक्षात इतरांना सामावून घ्यायला शिकले पाहिजे. ते सोडले तर आपल्यात आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक राहणार नाही. कार्यकर्त्यांना स्थान राहिले नाही म्हणून काँग्रेस पक्ष रसातळाला गेला, तसेच आपल्याकडे झाले तर आपलीही तीच गत राहील, असे फडणवीस यांनी बजावले. 

महाराष्ट्रात दोनशे जागा जिंकू !सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या दीड वर्षात पाच वर्षांची कामे करून दाखवायची आहेत. त्यासाठी ट्वेंटी-ट्वेंटी सारखी मॅच खेळणे सुरू झाले असून, २०२४ च्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकूनच ही मॅच संपुष्टात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विजय डोक्यात जाऊ देऊ नका. एकमेकांना सोबत घेऊन समन्वयाने आपण पुढे गेलो तरच वारंवार जिंकू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा