शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आता थांबायचं नाही, महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:51 IST

विधान परिषदेच्या पराभवावर सुनावले खडे बोल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आपल्या नेत्यांमधील कार्यकर्ता मेला तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. नेते असाल तर नेत्यासारखे वागा, सर्वांना सामावून घ्यायला शिका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजप कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी बोलताना स्वपक्षीयांना सुनावले. अमरावतीमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी नेत्यांची कानउघाडणी केली. 

२०१४ पासून आपल्याला निवडणुका जिंकायची सवय लागली आहे. आपण एक निवडणूक हरलो तरी चर्चा होते. विदर्भातील आणि त्यातही अमरावतीतील (रणजित पाटील)  पराभवाचे आत्मचिंतन आपण केलेच पाहिजे. तीन हजार मतांनी आपला उमेदवार हरतो आणि त्या ठिकाणी सहा हजार बाद झालेली मते आपलीच असल्याचे दिसते. हे आत्मचिंतन करण्यासारखेच आहे. आपण सगळे नेते आहोत, नेत्यांनी नेत्यांसारखेच वागले पाहिजे; पण नेता हा नेताच राहिला आणि त्याच्यातील कार्यकर्ता मेला तर तो नेताही राहणार नाही. नरेंद्र मोदी हे आपले नेते आहेत; पण ते आजही संघटनेला पूर्णत: समर्पित, शरण आहेत. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. पक्षाला विचारल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. आजही  प्रचारकासारखे जीवन जगतात. 

पक्षात इतरांना सामावून घ्यायला शिकले पाहिजे. ते सोडले तर आपल्यात आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक राहणार नाही. कार्यकर्त्यांना स्थान राहिले नाही म्हणून काँग्रेस पक्ष रसातळाला गेला, तसेच आपल्याकडे झाले तर आपलीही तीच गत राहील, असे फडणवीस यांनी बजावले. 

महाराष्ट्रात दोनशे जागा जिंकू !सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या दीड वर्षात पाच वर्षांची कामे करून दाखवायची आहेत. त्यासाठी ट्वेंटी-ट्वेंटी सारखी मॅच खेळणे सुरू झाले असून, २०२४ च्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकूनच ही मॅच संपुष्टात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विजय डोक्यात जाऊ देऊ नका. एकमेकांना सोबत घेऊन समन्वयाने आपण पुढे गेलो तरच वारंवार जिंकू, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा