शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केतकी चितळेला मी ओळखत नाही : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 1:57 AM

केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे महागाईच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी

नाशिक : केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली तर मी स्वत: उभी राहीन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची हॉटेल एमराल्ड पार्क येथे पत्रकार परिषद झाली, यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. इतर प्रश्नांपेक्षा वाढत्या महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेट्रोल, डिझेल बरोबरच गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी भोंग्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या जाहीर सभेतून मांडलेली भूमिका वास्तववादी असल्याचे सांगत त्या म्हणाल्या अनिल देशमुख यांना अटक करून इतके दिवस झाले आहेत. १०८ वेळा त्यांच्यावर धाडी टाकूनही त्यांच्याकडे काहीही सापडले नाही तर १०९ व्या वेळी धाड टाकण्याचा विक्रमही करण्यात आला, असे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्यावरील टीकेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची असून याबाबत पक्षीय पातळीवर चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल कारण ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चौकट-

वादानंतर नातं अधिक घट्ट होतं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, भांड्याला भांड लागलं की थोडेफार वाद हे होतातच आणि ते एक चांगले लक्षण आहे. कारण वाद झाले की नात अधिक घट्ट होत जात. त्यांनाही खासदार शरद पवार यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :NashikनाशिकSupriya Suleसुप्रिया सुळेKetaki Chitaleकेतकी चितळे