सुरगाण्यात दीड हजार घरांचे नुकसान
By Admin | Updated: May 29, 2014 16:27 IST2014-05-28T23:55:07+5:302014-05-29T16:27:04+5:30
सुमारे ६० गावांना चांगलेच झोडपून काढले.

सुरगाण्यात दीड हजार घरांचे नुकसान
सुरगाणा : तालुक्यात बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळीवारा व गारपिटीच्या तडाख्याने बाºहे, राक्षसभुवन, ठाणगाव, गुरुटेंभी, गोपाळपूर, पळसन, खोबळा आदि गावांसह सुमारे ६० गावांना चांगलेच झोडपून काढले. या गावांमधील इंदिरा आवास योजनेची घरकुले तसेच खासगी राहती घरे, दवाखाना, अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा आदिंचे नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये घरावर झाडे मोडून उन्मळून पडली आहेत. या गावातील महिला, लहान मुले, जीव मुठीत धरून तासभर घराच्या कानाकोपर्यात दडून बसले होते. जोरदार वादळाने एका क्षणात होत्याचे नव्हते केले. मवाडा येथील नागेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीवरील पत्रे पूर्णपणे उखडून गेले असून, इमारतीपासून शेकडो फूट अंतरावर ते उडाले आहेत. या वादळी तडाख्यात ठाणगाव परिसरात १५ तर गावात १० विजेचे खांब भुईसपाट झाले आहेत. गावातील ३०० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच लताबाई महाले यांनी दिली. ठाणगाव गावात पाणीपुरवठा विजेअभावी बंद असून, दोन हातपंपावर रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी थांबावे लागत आहे. करंजूल (पे) ते बाºहे रस्त्यावर मोहाचे झाड उन्मळून पडल्याने तहसीलदारांचेच वाहन आडमार्गावरून काढावे लागले. महिला, मुले यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असल्याने सायंकाळपर्यंत मनात धाकधूक होती. गोपाळपूर, बाºहे, गुरुटेंभी, मवाडा या गाव परिसरात शेकडो वृक्ष मोडून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सुरगाणा परिसरात भदर, घाटमाथ्यावर सराड, खरुडे, शिंदे, बोरगाव, माणी या परिसरात वादळाने चांगलेच झोडपले आहे.