शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
3
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
4
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
5
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
6
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
7
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
8
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
9
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
10
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
11
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
12
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
13
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
14
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
15
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
16
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
17
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
18
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
19
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
20
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?

नाशिक शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:10 IST

नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षेत्र ओस पडले आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम आहे. महापालिकेने फुल बाजाराला हात घातला असला आणि दररोज कितीही मोहिमा राबवल्या तरी फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रश्नच सुटणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसराफ बाजारातील मोहिम औपचारीकमेनरोडसह अनेक भागात समस्या

संजय पाठक, नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षेत्र ओस पडले आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम आहे. महापालिकेने फुल बाजाराला हात घातला असला आणि दररोज कितीही मोहिमा राबवल्या तरी फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रश्नच सुटणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

नाशिक शहरात महापालिकेने फेरीवाला क्षेत्रांची निर्मिती केली आहे. त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यासाठी महापालिकेच्या महासभेने घेतलेले निर्णय तसेच शहर फेरीवाला समिती आणि विभागीय फेरीवाला धोरण समितीने केलेले ठराव या विषयी तफावती आहे. अर्थात, फेरीवाल्यांसाठी दिल्या जाणाºया जागा वाहतूकीला अडथळा ठरणार नाही अशा पध्दतीने दिल्या जातात आणि दुसरीकडे रहदारी गर्दी किंवा नागरी वसाहतच नसेल तर व्यवसाय कसा काय होणार हा फेरीवाल्यांचा प्रश्न असतो. या मतभेदातून किमान काही क्षेत्र वगळले तर अन्य भागात तरी ते यशस्वी व्हायला हवेत. परंतु तसे होत नाही. मुळात महापालिकेने अनेक भागात फेरीवाला क्षेत्र चांगल्या पध्दतीने राबविले असले तरी नाशिक गावठाण भागातील प्रश्न सोडवता आलेला नाही.

मेनरोडवरील कटलरी, कापड, बुट चप्पल विक्रेते असो किंवा सराफ बाजारातील फुल बाजार अथवा रविवार कारंजा, बोहोरपट्टी असो प्रश्न सुटला नाही. भद्रकाल भाजी मार्केट सारख्या अतिदाटीच्या भागात तर विचारायलाच नको इतकी गंभीर समस्या आहे. सराफ बाजारातील फुल विक्रेत्यांना केवळ हटवून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी पर्यायी सोयीची जागा एकतर दिली पाहिजे अथवा फेरीवाला क्षेत्राप्रमाणे विशिष्ट वेळेत व्यवसायाची परवानगी दिली पाहीजे तरच हा प्रश्न सुटू शकले. आज येथील सराफ व्यवसायिकांचा असलेला विरोध चुुकीचा नाही. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करून केवळ अतिक्रमणाच्या मुळे ग्राहक फिरणार नसेल तर तेथे त्यांचा विरोध होणे स्वाभाविक आहे. महापालिकेने आत्ता तर सराफ बाजारालाच हात घातला. मेनरोडला हात घातल्यानंतर तर आणखी आव्हाने उभी राहणार आहेत.समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता केवळ कारवाई करीत राहीली तर प्रश्न सुटणे कठीण आहे. त्यामुळे सर्वसमावेशक तोडगा हवा तसे झाल तर आजचे तिबेटीयन मार्केटजवळील पावभाजी विक्रेत्यांची जागा किंवा अलिकडे कॉलेजरोडला डॉन बॉस्को लगत फेरीवाला क्षेत्रात स्थिरावलेली खाऊ गल्ली अशा प्रकारची यशस्वीता लाभू शकेल. एक दिवस कारवाई आणि दहा दिवस आराम यातून काहीच हाती पडणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण