शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:10 IST

नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षेत्र ओस पडले आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम आहे. महापालिकेने फुल बाजाराला हात घातला असला आणि दररोज कितीही मोहिमा राबवल्या तरी फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रश्नच सुटणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसराफ बाजारातील मोहिम औपचारीकमेनरोडसह अनेक भागात समस्या

संजय पाठक, नाशिक- रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा प्रश्न नवा नाही. हा रोजीरोटीचा भाग असल्याने खरे तर हा सामाजिक प्रश्न आहे. सर्वाेच्च न्यायालयामुळे फेरीवाला धोरण आले, त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या परंतु हे सर्व कागदावरच! नाशिकमध्ये अनेक फेरीवाला क्षेत्र ओस पडले आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमण कायम आहे. महापालिकेने फुल बाजाराला हात घातला असला आणि दररोज कितीही मोहिमा राबवल्या तरी फेरीवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा प्रश्नच सुटणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

नाशिक शहरात महापालिकेने फेरीवाला क्षेत्रांची निर्मिती केली आहे. त्याविषयी कोणाचे दुमत नाही. मात्र त्यासाठी महापालिकेच्या महासभेने घेतलेले निर्णय तसेच शहर फेरीवाला समिती आणि विभागीय फेरीवाला धोरण समितीने केलेले ठराव या विषयी तफावती आहे. अर्थात, फेरीवाल्यांसाठी दिल्या जाणाºया जागा वाहतूकीला अडथळा ठरणार नाही अशा पध्दतीने दिल्या जातात आणि दुसरीकडे रहदारी गर्दी किंवा नागरी वसाहतच नसेल तर व्यवसाय कसा काय होणार हा फेरीवाल्यांचा प्रश्न असतो. या मतभेदातून किमान काही क्षेत्र वगळले तर अन्य भागात तरी ते यशस्वी व्हायला हवेत. परंतु तसे होत नाही. मुळात महापालिकेने अनेक भागात फेरीवाला क्षेत्र चांगल्या पध्दतीने राबविले असले तरी नाशिक गावठाण भागातील प्रश्न सोडवता आलेला नाही.

मेनरोडवरील कटलरी, कापड, बुट चप्पल विक्रेते असो किंवा सराफ बाजारातील फुल बाजार अथवा रविवार कारंजा, बोहोरपट्टी असो प्रश्न सुटला नाही. भद्रकाल भाजी मार्केट सारख्या अतिदाटीच्या भागात तर विचारायलाच नको इतकी गंभीर समस्या आहे. सराफ बाजारातील फुल विक्रेत्यांना केवळ हटवून हा प्रश्न सुटणार नाही तर त्यासाठी पर्यायी सोयीची जागा एकतर दिली पाहिजे अथवा फेरीवाला क्षेत्राप्रमाणे विशिष्ट वेळेत व्यवसायाची परवानगी दिली पाहीजे तरच हा प्रश्न सुटू शकले. आज येथील सराफ व्यवसायिकांचा असलेला विरोध चुुकीचा नाही. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करून केवळ अतिक्रमणाच्या मुळे ग्राहक फिरणार नसेल तर तेथे त्यांचा विरोध होणे स्वाभाविक आहे. महापालिकेने आत्ता तर सराफ बाजारालाच हात घातला. मेनरोडला हात घातल्यानंतर तर आणखी आव्हाने उभी राहणार आहेत.समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता केवळ कारवाई करीत राहीली तर प्रश्न सुटणे कठीण आहे. त्यामुळे सर्वसमावेशक तोडगा हवा तसे झाल तर आजचे तिबेटीयन मार्केटजवळील पावभाजी विक्रेत्यांची जागा किंवा अलिकडे कॉलेजरोडला डॉन बॉस्को लगत फेरीवाला क्षेत्रात स्थिरावलेली खाऊ गल्ली अशा प्रकारची यशस्वीता लाभू शकेल. एक दिवस कारवाई आणि दहा दिवस आराम यातून काहीच हाती पडणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण