शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

‘नमामि गोदा’ म्हणून गोदावरी प्रदुषण मुक्त होईल कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 13:40 IST

नाशिक : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या दक्षीण गंगा गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्याचा मनोदय महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला साकडे घालणार असल्याचे जाहिर केले. तथापि, केवळ सरकारवर अवलंबून काय होणार, प्रत्यक्षात महापालिका या विषयात किती गंभीर आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या घोषणेत सवंगतामहापालिका काय करणार हे महत्वाचे

संजय पाठक, नाशिक : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या दक्षीण गंगा गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्याचा मनोदय महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला साकडे घालणार असल्याचे जाहिर केले. तथापि, केवळ सरकारवर अवलंबून काय होणार, प्रत्यक्षात महापालिका या विषयात किती गंभीर आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे.

नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरसिंग पध्दतीने अर्थसंकल्पीय महासभा घेण्यात आली. महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा म्हंटली की त्यात मागण्या आणि सवंग घोषणांचा वर्षाव असतो. प्रत्येक महापौरांना आपल्या कारकिर्दीत काही तरी संस्मणीय व्हावे असे वाटते त्या दृष्टीने अर्थसंकल्पीय सभेत ते संकल्प करत असतात. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गोदावरी प्रदुषणमुक्तीचा संकल्प केला. तो गैर नाही. मात्र त्यासाठी केंद्र शासनाला साकडे घालून केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गोदावरीचा उगम नाशिकमध्ये होत असला त ही नदी तब्बल सहा राज्यातून जाते. महाराष्टÑ, तेलगांना, आंध्र प्रदेश या तीन राज्यातून ही नदी प्रामुख्याने वाहत असते. परंतु मध्य प्रदेश, ओरीसा आणि कर्नाटक या राज्यातील नद्याही गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे अगदी राष्ट्रीय पातळीवरील विचार करताना केंद्र शासनाकडून नमामि गोदेची अपेक्षा बागळगणे गैर नाही. तथापि, मुळात ज्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचा उगम झाला. तेथील स्थिती काय आहे याचा विचार करायला हवा.

नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात पर्यावरण प्रेमींनी गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी खूपच प्रयत्न केलेत आणि कायदेशीर लढाई लढली परंतु गेल्या पाच वर्षात त्यात फार फरक पडला नाही. उच्च न्यायालयाने ही केस जिंवत ठेवली आहे आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती देखील नियुक्ती केली आहे. तथापि, उच्च न्यायालयाचे आदेश आणि निरीच्या शिफारसी याबाबत नाशिक महापालिकेने किती अंमलबजावणी झाली आहे, याचा विचार केला तर महापौरांना शासन दुरच परंतु महापालिकेलाच या दोन वर्षात (विद्यमान महापौरांच्या कारकिर्दीत) करता येईल. उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील गटारी आणि नदीचे विलगीकरण म्हणजेच रिव्हर सिव्हर वेगळे झालेले नाही. महापालिकेने पावसाळी गटार योजना राबविली परंतु त्याला अनेक ठिकाणी गटारी जोडल्याने गोदावरी प्रदुषणमुक्त होण्यापेक्षा प्रदुषणात भर पडत आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त तथा उच्चस्तरीय समितीचे प्रमुख महेश झगडे असताना नाशिकमध्ये मलनिस्सारण व्यवस्थेचे आॅडीट करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. परंतु त्याला मुहूर्त लागलेला नाही. महापालिकेची मलनिस्सारण केंद्रेच सर्वाधिक प्रदुषणकारी ठरली आहेत. त्यातून निकषानुसार दहा पेक्षा कमी बीओडी असायला हवे ते अजुनही तीस पर्यंतच आहेत. जुन्या निकषानुसार ही सर्व केंद्रे कालबाह्य झाली आहेत. परतु या केंद्रांच्या नुतनीकरणाला महापालिकेला वेळ मिळत नाही.

सतीश कुलकर्णी हे गेल्या नोव्हेंबर महिन्यात महापौर झाल्यानंतर पहिल्याच खाते प्रमुखांच्या बैठकीत नाले बारमाही वाहणे बंद करण्याचे आदेश दिले होते. गटारीमुळे नाले बारमाही वाहतात हे उघड आहे. परंतु त्याची जरी अंमलबजावणी झाली तरी खूप काही गोदामातेसाठी केल्यासारखे होईल. शासन स्तरावरील गोष्टी शासन करेलच परंतु किमान ज्या गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीत आहेत त्या केल्या तरी गोदेला नमन केल्यासारखे होईल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण