शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘नमामि गोदा’ म्हणून गोदावरी प्रदुषण मुक्त होईल कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 13:40 IST

नाशिक : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या दक्षीण गंगा गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्याचा मनोदय महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला साकडे घालणार असल्याचे जाहिर केले. तथापि, केवळ सरकारवर अवलंबून काय होणार, प्रत्यक्षात महापालिका या विषयात किती गंभीर आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या घोषणेत सवंगतामहापालिका काय करणार हे महत्वाचे

संजय पाठक, नाशिक : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या दक्षीण गंगा गोदावरी नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी आता नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्याचा मनोदय महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी केंद्र शासनाला साकडे घालणार असल्याचे जाहिर केले. तथापि, केवळ सरकारवर अवलंबून काय होणार, प्रत्यक्षात महापालिका या विषयात किती गंभीर आहे, याचा आढावा घेण्याची गरज आहे.

नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हीडीओ कॉन्फरसिंग पध्दतीने अर्थसंकल्पीय महासभा घेण्यात आली. महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा म्हंटली की त्यात मागण्या आणि सवंग घोषणांचा वर्षाव असतो. प्रत्येक महापौरांना आपल्या कारकिर्दीत काही तरी संस्मणीय व्हावे असे वाटते त्या दृष्टीने अर्थसंकल्पीय सभेत ते संकल्प करत असतात. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गोदावरी प्रदुषणमुक्तीचा संकल्प केला. तो गैर नाही. मात्र त्यासाठी केंद्र शासनाला साकडे घालून केंद्र शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गोदावरीचा उगम नाशिकमध्ये होत असला त ही नदी तब्बल सहा राज्यातून जाते. महाराष्टÑ, तेलगांना, आंध्र प्रदेश या तीन राज्यातून ही नदी प्रामुख्याने वाहत असते. परंतु मध्य प्रदेश, ओरीसा आणि कर्नाटक या राज्यातील नद्याही गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे अगदी राष्ट्रीय पातळीवरील विचार करताना केंद्र शासनाकडून नमामि गोदेची अपेक्षा बागळगणे गैर नाही. तथापि, मुळात ज्या नाशिकमध्ये गोदावरी नदीचा उगम झाला. तेथील स्थिती काय आहे याचा विचार करायला हवा.

नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात पर्यावरण प्रेमींनी गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी खूपच प्रयत्न केलेत आणि कायदेशीर लढाई लढली परंतु गेल्या पाच वर्षात त्यात फार फरक पडला नाही. उच्च न्यायालयाने ही केस जिंवत ठेवली आहे आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती देखील नियुक्ती केली आहे. तथापि, उच्च न्यायालयाचे आदेश आणि निरीच्या शिफारसी याबाबत नाशिक महापालिकेने किती अंमलबजावणी झाली आहे, याचा विचार केला तर महापौरांना शासन दुरच परंतु महापालिकेलाच या दोन वर्षात (विद्यमान महापौरांच्या कारकिर्दीत) करता येईल. उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील गटारी आणि नदीचे विलगीकरण म्हणजेच रिव्हर सिव्हर वेगळे झालेले नाही. महापालिकेने पावसाळी गटार योजना राबविली परंतु त्याला अनेक ठिकाणी गटारी जोडल्याने गोदावरी प्रदुषणमुक्त होण्यापेक्षा प्रदुषणात भर पडत आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त तथा उच्चस्तरीय समितीचे प्रमुख महेश झगडे असताना नाशिकमध्ये मलनिस्सारण व्यवस्थेचे आॅडीट करण्याचे आदेशीत करण्यात आले होते. परंतु त्याला मुहूर्त लागलेला नाही. महापालिकेची मलनिस्सारण केंद्रेच सर्वाधिक प्रदुषणकारी ठरली आहेत. त्यातून निकषानुसार दहा पेक्षा कमी बीओडी असायला हवे ते अजुनही तीस पर्यंतच आहेत. जुन्या निकषानुसार ही सर्व केंद्रे कालबाह्य झाली आहेत. परतु या केंद्रांच्या नुतनीकरणाला महापालिकेला वेळ मिळत नाही.

सतीश कुलकर्णी हे गेल्या नोव्हेंबर महिन्यात महापौर झाल्यानंतर पहिल्याच खाते प्रमुखांच्या बैठकीत नाले बारमाही वाहणे बंद करण्याचे आदेश दिले होते. गटारीमुळे नाले बारमाही वाहतात हे उघड आहे. परंतु त्याची जरी अंमलबजावणी झाली तरी खूप काही गोदामातेसाठी केल्यासारखे होईल. शासन स्तरावरील गोष्टी शासन करेलच परंतु किमान ज्या गोष्टी महापालिकेच्या अखत्यारीत आहेत त्या केल्या तरी गोदेला नमन केल्यासारखे होईल.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण