शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

परंपरा, नवतेची सुंदर सांगड घालणाऱ्या लेखिकेचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:51 IST

लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो.

नाशिक : लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. यंदा साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड ही निवडणुका न घेता झाली आहे. अशाप्रकारे निवडीचा पहिला मान डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला आहे. डॉ. ढेरे यांचे नाशिकशी अनोखे बंध आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्तही आहेत. त्यांच्या निवडीविषयी साहित्यिकांच्या काही निवडक प्रतिक्रिया...अरुणा ढेरे यांची निवड ही अतिशय सार्थ निवड आहे. सध्याच्या काळात साहित्यातील लिहिता हात म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. एक अतिशय दमदार अशी परंपरा अरुणा यांच्या मागे उभी आहे. त्या आपल्या लेखनात परंपरा आणि नवता यांची सुंदर सांगड घालतात. खूप वर्षांनंतर कोणतेही राजकारण न होता अध्यक्ष जाहीर झाला आहे. असेच वाङ््मयीन व्यवहार भविष्यात व्हायला हवे. त्यामुळे वादविवाद होणार नाही. - किशोर पाठक, ज्येष्ठ कवीही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लेखन स्वतंत्र शैलीचे आहे. त्यांना वडिलांच्या साहित्याचा वारसा लाभला आहे. तरीपण त्यांनी स्वत:ची वेगळी लेखनशैली जपली आहे. सगळ्या स्त्रीरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विपूल लेखन केले आहे. पौराणिक व्यक्तिरेखांचा वर्तमानकाळाशी संवाद घडवून आणला आहे. - वेदश्री थिगळे, लेखिकाअरुणा ढेरे यांनी विविधांगी लेखन केले आहे. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक, ललित लेखन करणाºया या लेखिकेची सार्थ निवड झालेली दिसते. स्त्री लेखिका म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याकडून अध्यक्षीय भाषणात समकालीन साहित्याची मर्मग्राही विश्लेषण होईल, असा विश्वास वाटतो.- शंकर बो-हाडे, लेखकसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एका स्त्रीला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लोकसाहित्य, कथा, कादंबºया, ललित लेखन या साºयांचा त्यांच्या भाषणात अभ्यास दिसेल. त्यामुळे तरुणांना आणि साºयांनाच त्यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता असेल.  - प्रशांत केंदळे, कवीअरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अत्यंत आनंददायी आहे. त्यांच्या लेखनाला संशोधनाचा वारसा आहे. लालित्य हा त्यांच्या लिखाणाचा श्वास आहे. त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रास्ताविक दिले आहे तेदेखील अभ्यासपूर्ण आहे. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. याशिवाय अध्यक्षपदी राहताना आपण साहित्यबाह्य काही बोलणार नाही ही त्यांनी मांडलेली भूमिकाही महत्त्वाची आहे. - प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, समीक्षक

टॅग्स :literatureसाहित्यAruna Dhereअरुणा ढेरेNashikनाशिक