शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

परंपरा, नवतेची सुंदर सांगड घालणाऱ्या लेखिकेचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:51 IST

लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो.

नाशिक : लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणा-या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. यंदा साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड ही निवडणुका न घेता झाली आहे. अशाप्रकारे निवडीचा पहिला मान डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला आहे. डॉ. ढेरे यांचे नाशिकशी अनोखे बंध आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्तही आहेत. त्यांच्या निवडीविषयी साहित्यिकांच्या काही निवडक प्रतिक्रिया...अरुणा ढेरे यांची निवड ही अतिशय सार्थ निवड आहे. सध्याच्या काळात साहित्यातील लिहिता हात म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. एक अतिशय दमदार अशी परंपरा अरुणा यांच्या मागे उभी आहे. त्या आपल्या लेखनात परंपरा आणि नवता यांची सुंदर सांगड घालतात. खूप वर्षांनंतर कोणतेही राजकारण न होता अध्यक्ष जाहीर झाला आहे. असेच वाङ््मयीन व्यवहार भविष्यात व्हायला हवे. त्यामुळे वादविवाद होणार नाही. - किशोर पाठक, ज्येष्ठ कवीही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लेखन स्वतंत्र शैलीचे आहे. त्यांना वडिलांच्या साहित्याचा वारसा लाभला आहे. तरीपण त्यांनी स्वत:ची वेगळी लेखनशैली जपली आहे. सगळ्या स्त्रीरेखांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विपूल लेखन केले आहे. पौराणिक व्यक्तिरेखांचा वर्तमानकाळाशी संवाद घडवून आणला आहे. - वेदश्री थिगळे, लेखिकाअरुणा ढेरे यांनी विविधांगी लेखन केले आहे. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक, ललित लेखन करणाºया या लेखिकेची सार्थ निवड झालेली दिसते. स्त्री लेखिका म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याकडून अध्यक्षीय भाषणात समकालीन साहित्याची मर्मग्राही विश्लेषण होईल, असा विश्वास वाटतो.- शंकर बो-हाडे, लेखकसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एका स्त्रीला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे लोकसाहित्य, कथा, कादंबºया, ललित लेखन या साºयांचा त्यांच्या भाषणात अभ्यास दिसेल. त्यामुळे तरुणांना आणि साºयांनाच त्यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता असेल.  - प्रशांत केंदळे, कवीअरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड अत्यंत आनंददायी आहे. त्यांच्या लेखनाला संशोधनाचा वारसा आहे. लालित्य हा त्यांच्या लिखाणाचा श्वास आहे. त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रास्ताविक दिले आहे तेदेखील अभ्यासपूर्ण आहे. कवी, संशोधक, वक्ता असा सगळ्या गुणांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पहायला मिळतो. याशिवाय अध्यक्षपदी राहताना आपण साहित्यबाह्य काही बोलणार नाही ही त्यांनी मांडलेली भूमिकाही महत्त्वाची आहे. - प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, समीक्षक

टॅग्स :literatureसाहित्यAruna Dhereअरुणा ढेरेNashikनाशिक