शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

नाशिक जिल्ह्याचा दिल्लीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:18 AM

नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात २ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण कामाची दखल

नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात२ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यापाठोपाठ आता जिल्ह्णास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियान यात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्णात कुटुंब संपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी देण्यात आल्या. तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅप ‘एसएसजी २०१८’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्णासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्हा २ लाख २१ हजार ३२१ प्रतिक्रिया नोंदवून देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने नाशिक जिल्ह्णाचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्णात यात स्वच्छताफेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींचे रंगरंगोटीने सुशोभिकरण करण्यात आले होते. याची दखल घेत करण्यात आलेल्या ग्रामीण मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून १ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत गावांची तपासणी करण्यात आली होती.पोषण आहार अभियानांतर्गतही गौरवपोषण आहार अभियानात जिल्ह्णात १ सप्टेंबर पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे २ आॅक्टोबरला पोषण आहार अभियानाच्या सांगता कार्यक्रमात नाशिकचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या एक प्रकल्पाससह एका अंगणवाडी सेविकेचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. याचे सर्व श्रेय संबंधित अधिकारी व कर्मचाºयांचे आहे. एकत्रित काम केल्यावर यश मिळते हेच या सन्मानातून सिद्ध झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशपातळीवर होणारा सन्मान हा नाशिक जिल्ह्णाचा व जिल्ह्णातील नागरिकांचा सन्मान आहे. -डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.