शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

प्रामाणिक लोकांनी राजकारणात येण्याची गरज - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:18 AM

दिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभावी लोक राजकारणात येतील व त्यांनी लोकांची सेवा निरपेक्ष भावनेने केली तर लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नक्कीच उभे राहतील.

ठळक मुद्देकर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४व्या प्रबोधन व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभावी लोक राजकारणात येतील व त्यांनी लोकांची सेवा निरपेक्ष भावनेने केली तर लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नक्कीच उभे राहतील.राजकारणात तरु ण, प्रामाणिक व सेवाभावी लोकांनी येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाड मल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त आयोजित कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४व्या प्रबोधन व्याख्यानमालेत विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष निवृत्ती रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ‘राजकारण आणि समाजव्यवस्था’ या विषयावर सहावे पुष्प गुंफताना कडू बोलत होते.यावेळी दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, डॉ. भाऊसाहेब मोरे, प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, बाळासाहेब कदम, विलास पाटील, शिवाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, अजित आव्हाड, प्रतीक देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक व परिचय धनंजय वानले यांनी करून दिला. सूत्रसंचालन फाउण्डेशनचे अध्यक्ष तथा प्राचार्य विलास देशमुख यांनी केले. आभार संजय डिंगोरे यांनी मानले.