शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"गृहमंत्री कुणाच्या घरापर्यंत लक्ष ठेवू शकत नाहीत", छगन भुजबळांकडून देवेंद्र फडणवीसांची पाठराखण

By धनंजय रिसोडकर | Updated: February 9, 2024 16:56 IST

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले.

नाशिक : सध्या फारच भयंकर प्रकार घडत असून डोकेच चक्रावून जाते. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच समजेनासे होऊ लागते. कुणीही खिशातून पिस्तूल काढते, गोळ्या चालवते. किती हे दुर्दैव आहे; पण पोलिस किंवा गृहमंत्री काही कुणाच्या घरापर्यंत लक्ष घालू शकत नाहीत, अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एकप्रकारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना भुजबळ यांनी हे नमूद केले. पोलिस हे चोऱ्या-माऱ्या, दंगल, गँगवॉर, दहशतवादाच्या घटनांमध्ये लक्ष घालून त्यावर नियंत्रण आणू शकतात. किंवा कुणी सुरक्षा मागितली असल्यास त्याला सुरक्षा देतात. मात्र, या घोसाळकर प्रकरणात दोघे मित्र होते, तर उल्हासनगरच्या घटनेतील गायकवाड हे दोघेही एकमेकांचे भाऊबंद होते. अशी आपापसात काही भांडणे असल्यास त्यात पोलिस किंवा अन्य कुणालाही काही कल्पना नसते, असेही भुजबळ यांनी नमूद केले. 

वेगवेगळ्या पक्षात असले तरी एकमेकांचे नातेवाईक आणि त्यात भाऊबंदकी असल्यास त्या सर्व बाबी पोलिस तपासाचा भाग आहेत. तुमच्याबरोबर वावरणारी माणसे अचानकपणे असे प्रकार करत असतील तर ते दुर्दैवच आहे. मात्र, हे प्रकार पाहता लायसन्सबाबतचे नियम अधिक कठोर करायला हवेत, असे वाटते. वाईट धंदे असणाऱ्यांना परवाने देऊ नयेत किंवा शस्त्र दिलेली असल्यास ती काढून घेण्याची आवश्यकता आहे. हा मॉरीस तर जेलमध्ये जाऊन आलेला होता, तर त्याला परवाना कसा मिळतो, तेदेखील बघायला हवे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ