शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क अध्यादेशाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2023 16:52 IST

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी केला.

अमोल तुपे

देवगाव (नाशिक) : देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्राने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ३१ डिसेंबरपर्यंत ४० टक्के शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम होणार असल्याने देवगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली. यंदा पावसाने ओढ दिल्याने आधीच शेतकरी अडचणीत आले आहेत. साधारण सप्टेंबर महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जगविण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क आकारणीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे यांनी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी सरपंच विनोद जोशी, देवगाव सोसायटीचे संचालक दिगंबर सोमवंशी, धनंजय जोशी, मनोहर बोचरे, सचिन बोचरे, गोरख निलख, श्यामराव लोहारकर, अण्णा उफाडे, ज्ञानेश्वर साबळे, जगन बोचरे, वैभव जोशी, अनिल खुळे, योगेश बोचरे, संतोष साबळे, पांडुरंग कूलथे, सुरेश राजगुरू, बबन पिंगट, प्रकाश लोहारकर, गणपत बोचरे, संजय मेमाणे, प्रभाकर घाडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी