शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये, २५ दिवसांत ३८ मिमी नोंद; हजारो हेक्टर शेतपीकांचा चिखल

By अझहर शेख | Updated: March 28, 2023 16:48 IST

अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. मागील २५ दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात.

नाशिक : जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोरदार झाेडपून काढले. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून येत असल्याने शेतकरी हवलादिल झाला होता. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. मागील २५ दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊसनाशिक जिल्ह्यात झाला असून सुमारे ३८.६मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून २५मार्चपर्यंत ३८ मिमी इतका पाऊस पडला. राज्यात इतकी नोंद कुठल्याही जिल्ह्यात अद्याप झालेली नाही. यामुळे शेतपीकांचे नुकसानदेखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील शेतपिकांचा चिखल झाला आहे.

कांदा, गहू, द्राक्ष, भाजीपाला, आंबा, कांदा रोपे, डाळिंब, हरभरा, टमाटा आदी शेतपीकांची अवकाळी पावसामुळे नासाडी झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हाताशी आलेले पीक डोळ्यांदेखत गेल्याने बळीराजा हादरला. कृषी खात्याकडून अवकाळी पावसाच्या शेतपीकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात गडगडाटी वादळी पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले होते. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली; मात्र पुन्हा पंधरवड्यात अवकाळीचे ढग जिल्ह्यावर दाटून येण्यास सुरूवात झाली. १६ मार्च ते २० मार्च या कालावधीत अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वीजांचा कडकडाट अन् गडगडाटासह झालेल्या वादळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या कालावधीत जिल्ह्यातील काही तालुक्यांत गारपिटीदेखील झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात ३८.६ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद या महिन्यात नाशिकमध्ये झाली.

आठवडाभरापासून विश्रांती!अवकाळी पावसाने मागील आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहू लागल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अवकाळी पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी शेतीचे झालेले नुकसान द्राक्षबागा, डाळींबागा, टोमॅटोच्या बागांमधील नुकसानीनंतर आवरासावर करताना दिसून येत आहे. फळबागांमधील तुटलेल्या तारा, बांबूंची दुरूस्ती शेतमजुरांनी हाती घेतली आहे.

काही प्रमुख शहरांमधील अवकाळी पाऊस (मि.मी मध्ये)

मुंबई- २५.८पुणे-९.७औरंगाबाद-२९.४सातारा-१०.६सांगली-८.८जळगाव- १२.६अकोला-१४.४परभणी-६.६नागपुर, १.९

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस