शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कोरोनाच्या आकडेवारीबाबत राज्य शासनाकडून लपवा छपवी : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:37 IST

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

ठळक मुद्देअन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिकशासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभावघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलाभाजपा नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर आरोप

नाशिक : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून, शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव, घाईने घेतलेले निर्णय यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसू नये, म्हणून राज्य शासन आकड्यांची लपवा छपवी करत असल्याचा आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने केंद्र शासनाने केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील अनेक मंत्री घराबाहेर पडले नाही. वास्तविक या काळात त्यांचे योगदान मोठे असायला हवे होते, पण तसे झाले नाही. राज्य शासनाने लवकरात लवकर रुग्णांचे स्वॅब घेऊन चाचणी केली असती तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली असती, पण प्रशासनाचा समन्वय नसल्याने ते शक्य झाले नाही. पर्यायाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य शासन अपयशी ठरले आहे. आपले अपयश लपविण्यासाठी अनेक ठिकाणी प्रायव्हेट लॅबला स्वॅब घेऊ दिले जात नाहीत. रुग्णसंख्या वाढलेली दिसू नये यासाठी आकड्यांची लपवा छपवी केली जात आहे. एका अर्थाने राज्य शासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. प्रायव्हेट लॅबलाही स्वॅब घेण्यास परवानगी देऊन चाचणी करू द्यावी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांवर उपचार करावेत. आकडे लपविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाकडे यंत्रणा पुरेशी नसल्याने अधिकाºयांच्या बदल्या करूनही शासन आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राज्य सचिव लक्ष्मण सावजी आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.शंभर कोटींची मदत तोकडी कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी केवळ १०० कोटींची मदत ही कमी असून, कोकणासाठी भरीव मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोनाबाबत केंद्राने योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असल्याचा दावाही महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचप्रमाणे केंद्रातील मोदी सरकारने एक वर्षाच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी महाजन यांनी दिली. कलम ३७०, रामजन्मभूमी, नागरिकत्व कायदा यांसारखे ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतले असून, देशातील जनतेने ते शांतपणे स्वीकारले असून, आज देशभरात शांततेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळेच हे शक्य झाले असल्याचे महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनNarendra Modiनरेंद्र मोदी