शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सरदवाडी येथे बिबट्याने पळवला बोकड

By admin | Updated: March 5, 2016 23:04 IST

बंदोबस्ताची मागणी: दोन महिन्यांपासून परिसरात दहशत कायम

सरदवाडी : सिन्नर तालुक्यातील सरदवाडी शिवारात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपातून बिबट्याने बोकड उचलून नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सरदवाडी गावाच्या पश्चिमेला वन विभागाचे जंगलक्षेत्र आहे. याच भागातील पांगरवाडीत राहणाऱ्या लक्ष्मण कुंवर यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा सुमारे ५० शेळ्या आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे कुंवर दांपत्य जंगलालगत शेळ्या चारत होते. यावेळी दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक कळपातील पूर्ण वाढ झालेल्या बोकडावर झडप घालून त्याला जंगलाकडे पळवून नेले. ही घटना कुंवर दांपत्यासमोर झाल्याने त्यांची भीतीपोटी पाचावर धारण बसली. जंगलाकडे बोकड घेऊन जात असलेल्या बिबट्याकडे ते हताशपणे बघत राहिले. डोळ्यांदेखत अवघ्या काही फुटांच्या अंतरावर हा थरार पाहिलेल्या कुंवर यांनी कळप घेऊन घराकडे जाणे पसंत केले.बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. घनदाट जंगल, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आणि बिबट्याचे वर्णन ऐकल्यानंतर युवकांनी भीतीपोटी बोकडाचा शोध घेण्याचा विचार सोडून दिला. शनिवारी सदर घटनेची माहिती सिन्नर येथील वन विभागास कळविल्यानंतर कार्यालयाकडून बिबट्याने खाल्लेल्या बोकडाचे अवशेष किंवा त्याचे फोटो काढून आणण्यास कर्मचाऱ्यांनी सुचविले, असे कुंवर यांनी सांगितले.महिनाभरापूर्वी सरदवाडी गावालगत माजी सरपंच बजुनाथ सिरसाट यांच्या उसाच्या शेतात बिबट्याने ठाण मांडले होते. सदर ऊस तोडल्यानंतर बिबट्याने आपला मुक्काम गावाच्या पश्चिमेकडील वन विभागाच्या जंगलात हलवला आहे. या कालावधीत बिबट्याने अनेक कुत्रे व कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. शेतात काम करणाऱ्या अनेक शेतमजुरांना अनेकवेळा बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)