शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

मुसळधार पावसाचा भाताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:25 IST

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.याच पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई मिळण्या पासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट कोसळले आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार खोसकर तसेच नागरिकांनी केली होती. नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, मुरंबी, सांजेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे भातशेती पाण्यात गेली असून, सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती