बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:16 IST2019-04-18T23:55:20+5:302019-04-19T00:16:48+5:30

गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.

Health effects due to changing environment | बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, पडसे, डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, तर लहान मुलांमध्ये ताप तसेच सर्दीचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढल्याचे दिसते.
सकाळच्या सुमारास कडाक्याचे ऊन जाणवत असताना दुपारी २ वाजेनंतर आभाळ दाटून येण्याचे तर काही भागांत पावसाचे थेंब पडण्याचे प्रकार घडत आहेत. तासभरानंतर पुन्हा उकाडा निर्माण होऊन सायंकाळपासून गार वारे वाहू लागतात. या विचित्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

Web Title: Health effects due to changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.