शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर मनपा आयुक्तांची कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 1:09 AM

शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

नाशिक : शहरासाठी असलेले मुबलक पाणी त्यातच होणारा अपव्यय यामुळे महापालिका आयुक्तांनी जलापव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विशेषत: जिल्हा प्रशासनाने पाणीकपातीबाबतचा अभिप्राय मागविल्यानंतर प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे.गंगापूर धरणात पुरेसा साठा असून, जलसंपदा विभागानेच दिलेल्या आरक्षणानुसार मुकणे आणि दारणा धरणांतूनदेखील पाणी मिळत आहे. महापालिकेने आरक्षणानुसार पाण्याचा वापर सुरू केला आहे, मात्र जिल्ह्याच्या आणि राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश स्थिती असून, पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे शहराच्या काही भागात पाण्याचा दुरुपयोग आणि अपव्ययदेखील होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या रडारवर महापालिका असून, दि. १४ मे रोजी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात महापालिका कसा वाढीव पाणीपुरवठ्याचा वापर करीत आहे याबाबतचा तपशील देतानाच पाणी काटकसरीने वापरण्यास सांगावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानेदेखील महापालिकेला पत्र पाठविले असून, त्यात पाणी आरक्षण त्याचा वापर आणि पाणी कपातीबाबतचा अभिप्राय मागविण्यात आल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याची काटकसर करणे सुरू केले आहे. परंतु पाण्याचा अपव्यय करणाºयांवर कठोर कारवाईदेखील केली आहे. त्याचप्रमाणे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील तातडीने सर्व संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेचा काटकसरीने वापरमहापालिकेच्या वतीने पाणी काटकसरीने वापरले जात असून, मुकणे धरणातून वापर सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून होणारा जलउपसा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील अगोदरच काटकसर सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका