शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वेळीच व्हा सावध! विनागॅरंटी कर्जाची ‘नो गॅरंटी’; तुम्हाला कोणी गंडा तर घालत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:16 IST

सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो ...

सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो किंवा बनावट फोन कॉल्स यापासून सावध होण्याची गरज आहे. कुठलेही प्रलोभन, भीतीला बळी न पडता आपली सद्सदविवेकबुद्धीचा वापर करत फसवणूक टाळण्यावर भर द्यावा, असे सायबर पोलिसांनी सांगितले.

कुठलीही कंपनी विनाव्याज कर्जपुरवठा करत नाही, तसेच कुठलीही कागदपत्रे न स्वीकारता अनोळखी व्यक्तीला कोणीही कसे कर्ज देऊ शकते? याचा विचारही करायला हवा, असे पोलीस सांगतात. अवघ्या दोन तासांत किंवा २४ तासांत कर्जाची रक्कम कोणीही विनाअटी-शर्तींशिवाय देऊच शकत नाही, यामुळे अशा बनावट कॉल्स करणाऱ्यांना नागरिकांनी प्रतिसाद देणे टाळायला हवे. जेणेकरून आर्थिक फसवणूक होणार नाही.

फसवणुकीची ही घ्या उदाहरणे

नाशिक रोड येथील सैन्य दलाच्या एका केंद्रात नोकरीवर असलेल्या जवानाला अशाच प्रकारे कर्जाची गरज भासली. या जवानाने कर्जपुरवठा करणाऱ्याची माहिती इंटरनेटवर तपासली. त्यानंतर जवानाला मोबाइल क्रमांकावर एक फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ला एका नामांकित फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून त्या जवानाला कर्ज देण्याचे आमिष दाखविले. यानंतर ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली वेळोवेळी १ लाख ९ हजार रुपये उकळले होते. त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास करत बिहार येथून दोघा २० वर्षीय युवकांना या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे सिमकार्ड व आठ मोबाइल जप्त करण्यात आले होते.

अव्वाच्या सव्वा टक्के व्याजदर

कर्ज मंजुरीचे आश्वासन देत कधी शून्य टक्के तर कधी प्रोसेसिंग फी माफ करण्याचे आमिष दाखवत केवळ दहा ते पंधरा टक्के व्याजदराचे आमिष अनेकदा दाखविले जाते; मात्र कर्ज दिल्यानंतर प्रत्यक्षात काही छुप्या पद्धतीने कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम व्याजदराच्या माध्यमातून कर्जदाराकडून घेतली जाते. यामुळे नागरिकांनी अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज घेताना सर्व बाबींची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.

वसुलीसाठी काय पण?

कर्ज देणाऱ्या खासगी संस्था अथवा कंपन्यांकडून कर्जाची परतफेड करताना काही हप्ते थकबाकी राहिल्यास त्याची वसुली करताना कुठल्याही थराला जाण्याचा मार्ग अवलंबविला जातो. यामुळे नागरिकांनी कर्ज घेताना सर्वतोपरी खबरदारी घ्यायला हवी. जेणेकरून नंतर कुठल्याही मनस्तापाची वेळ ओढावणार नाही.

 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी