शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच व्हा सावध! विनागॅरंटी कर्जाची ‘नो गॅरंटी’; तुम्हाला कोणी गंडा तर घालत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:16 IST

सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो ...

सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो किंवा बनावट फोन कॉल्स यापासून सावध होण्याची गरज आहे. कुठलेही प्रलोभन, भीतीला बळी न पडता आपली सद्सदविवेकबुद्धीचा वापर करत फसवणूक टाळण्यावर भर द्यावा, असे सायबर पोलिसांनी सांगितले.

कुठलीही कंपनी विनाव्याज कर्जपुरवठा करत नाही, तसेच कुठलीही कागदपत्रे न स्वीकारता अनोळखी व्यक्तीला कोणीही कसे कर्ज देऊ शकते? याचा विचारही करायला हवा, असे पोलीस सांगतात. अवघ्या दोन तासांत किंवा २४ तासांत कर्जाची रक्कम कोणीही विनाअटी-शर्तींशिवाय देऊच शकत नाही, यामुळे अशा बनावट कॉल्स करणाऱ्यांना नागरिकांनी प्रतिसाद देणे टाळायला हवे. जेणेकरून आर्थिक फसवणूक होणार नाही.

फसवणुकीची ही घ्या उदाहरणे

नाशिक रोड येथील सैन्य दलाच्या एका केंद्रात नोकरीवर असलेल्या जवानाला अशाच प्रकारे कर्जाची गरज भासली. या जवानाने कर्जपुरवठा करणाऱ्याची माहिती इंटरनेटवर तपासली. त्यानंतर जवानाला मोबाइल क्रमांकावर एक फोन आला. त्या व्यक्तीने स्वत:ला एका नामांकित फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून त्या जवानाला कर्ज देण्याचे आमिष दाखविले. यानंतर ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली वेळोवेळी १ लाख ९ हजार रुपये उकळले होते. त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास करत बिहार येथून दोघा २० वर्षीय युवकांना या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे सिमकार्ड व आठ मोबाइल जप्त करण्यात आले होते.

अव्वाच्या सव्वा टक्के व्याजदर

कर्ज मंजुरीचे आश्वासन देत कधी शून्य टक्के तर कधी प्रोसेसिंग फी माफ करण्याचे आमिष दाखवत केवळ दहा ते पंधरा टक्के व्याजदराचे आमिष अनेकदा दाखविले जाते; मात्र कर्ज दिल्यानंतर प्रत्यक्षात काही छुप्या पद्धतीने कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम व्याजदराच्या माध्यमातून कर्जदाराकडून घेतली जाते. यामुळे नागरिकांनी अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्यांकडून कर्ज घेताना सर्व बाबींची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.

वसुलीसाठी काय पण?

कर्ज देणाऱ्या खासगी संस्था अथवा कंपन्यांकडून कर्जाची परतफेड करताना काही हप्ते थकबाकी राहिल्यास त्याची वसुली करताना कुठल्याही थराला जाण्याचा मार्ग अवलंबविला जातो. यामुळे नागरिकांनी कर्ज घेताना सर्वतोपरी खबरदारी घ्यायला हवी. जेणेकरून नंतर कुठल्याही मनस्तापाची वेळ ओढावणार नाही.

 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी