हरित लवादाने याचिका फेटाळली
By Admin | Updated: May 29, 2014 00:20 IST2014-05-28T23:30:15+5:302014-05-29T00:20:03+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेली याचिका लवादाने फेटाळून लावली आहे.

हरित लवादाने याचिका फेटाळली
नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेली याचिका लवादाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे पर्यावरण रक्षण कार्यकर्त्यांना धक्का बसला असून, याप्रकरणी त्यांच्याकडून या विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा निर्धा करण्यात आला.
नाशिक मनपाने रस्ता रुंदीकरण तसेच इतर काही कारणांस्तव शहरातील सुमारे साडेतीनशेहून अधिक झाडांची कत्तल केल्याचा आरोप करीत वृक्षमित्र ऋषिकेश नाझरे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. महापालिका अनावश्यक झाडे तोडत असून वृक्षांची जोपर्यंत गणना होत नाही तोपर्यंत झाडे तोडू नयेत. हरित न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडे तोडली जाऊ नयेत, याबरोबरच महापालिकेची वृक्षप्राधिकरण समिती बरखास्त करावी. समिती निसर्ग रक्षणाचे कोणतेही काम करीत नाही, त्यांना त्याबाबत ज्ञान नसल्यामुळे ही समितीच रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल केली होती. त्यानुसार हरित प्राधिकरणाने वृक्षप्राधिकरण समितीच्या पंधरा सदस्यांना नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्याची परवानगी दिली होती.
याप्रकरणी लवदासमोर झालेल्या चर्चेनंतर नाझरे यांची याचिका फेटाळण्यात आली. सन २००६ मध्ये अशाच प्रकारची आणि मागण्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर सुनावणी होऊन त्याबाबतच्या काही मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नव्याने लवादाने यावर निर्णय घ्यावा हे उचित नसून नाझरे यांनी संबंधित संस्थेकडील माहिती घेऊन महापालिकेकडे मुद्दे मांडावेत, असा निकाल देण्यात आला. याबरोबरच वृक्षप्राधिकरण समिती बेकायदेशीर तसेच नियमाबा ठरविण्याचा अधिकार प्राधिकारणाला नसल्याने याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करता येत नसल्याचा निर्वाळा लवादाने दिला. (प्रतिनिधी)
मानहानी याचिका करणार दाखल
मनपाच्या विरोधात दाखल करणार्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. तथापी, संबंधिताने मनपाच्या कामात अडथळे आणले, सदस्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित केल्याने सदस्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नाझरे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे.
- संजय चव्हाण, नगरसेवक