शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

ग्रीन फटाके सर्वाेत्तम पर्याय, आता पर्यावरणस्नेही होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:09 IST

दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देपर्यावरण अभ्यास प्राचार्य किशोर पवार यांचे मतनागरिकांनीच सजग होण्याचे आवाहन

हिंदूंचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जात असतानाच यंदा सर्वोच्च न्यायालयाने केव्हाही फटाके वाजविण्यास घातलेले निर्बंध आणि ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दूरगामी आणि पर्यावरण संवर्धन करणारे स्वरूपाचे आहेत. विशेषत: ग्रीन फटाके हा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल, असे मत नाशिक येथील पर्यावरण अभ्यासक प्राचार्य किशोर पवार यांनी व्यक्त केले. फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत त्यांच्याशी झालेली चर्चा अशी...प्रश्न : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आल्याने बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. त्याविषयी काय वाटते.प्राचार्य पवार : दिवाळी सण मोठा असला तरी त्यातील फटाके हा विषय काहीसा वादग्रस्त आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके ही कल्पनाच चुकीची आहे. अवघ्या काही तासांत प्रचंड आवाज करणारे फटाके वाजवून त्याची राख होते. या फटाक्यांच्या आवाज आणि प्रकाशामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. अन्य नागरिकांनादेखील श्वसनाचे विकार होतात. प्राणी, पक्षी आणि झाडांवरदेखील परिणाम होत असतो. त्यामुळे आता या विषयावर काही तरी निर्णय घेणे अपेक्षितच होते तो घेतला हे चांगले झाले.प्रश्न : ग्रीन फटाक्यांचा पर्याय कसा वाटतो? अनेकांना ग्रीन फटाके म्हणजे काय हेच माहिती नाहीये.प्राचार्य पवार : ग्रीन फटाके म्हणजेच पर्यावरणपूरक फटाके ही संकल्पना नवीन नाहीये. नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च युनिट म्हणजेच नीरीने याबाबत संशोधन केले आहे. केंद्र सरकारच्या सीआरएसआर संस्थेसह अन्य अनेक संस्थांनी संशोधन केले आहे. पारंपरिक फटाक्यातील अनेक प्रकारची रसायने यात नसतात. मुळात आवाजाचे हे फटाके नसतात. केवळ प्रकाश दिसतो. आकाशात गेल्यानंतरदेखील ते चांदणे होऊन कोसळताना दिसतात. त्यातून कमीत कमी प्रदूषण होते. अनेकदा विदेशातील कार्यक्रमात अशाप्रकारची आतषबाजी आपण बघतो. तोच हा प्रकार असतो, परंतु तो पर्यावरणपूरक असतो. आवाज नसल्याने ध्वनिप्रदूषण होत नाही. धूरही अत्यल्प असतो.प्रश्न : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणखी काय सांगाल?प्राचार्य पवार : दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.मुलाखत: संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकenvironmentवातावरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCrackersफटाके