शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ग्रीन फटाके सर्वाेत्तम पर्याय, आता पर्यावरणस्नेही होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:09 IST

दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देपर्यावरण अभ्यास प्राचार्य किशोर पवार यांचे मतनागरिकांनीच सजग होण्याचे आवाहन

हिंदूंचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जात असतानाच यंदा सर्वोच्च न्यायालयाने केव्हाही फटाके वाजविण्यास घातलेले निर्बंध आणि ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दूरगामी आणि पर्यावरण संवर्धन करणारे स्वरूपाचे आहेत. विशेषत: ग्रीन फटाके हा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे कमीत कमी प्रदूषण होईल, असे मत नाशिक येथील पर्यावरण अभ्यासक प्राचार्य किशोर पवार यांनी व्यक्त केले. फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत त्यांच्याशी झालेली चर्चा अशी...प्रश्न : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध आल्याने बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. त्याविषयी काय वाटते.प्राचार्य पवार : दिवाळी सण मोठा असला तरी त्यातील फटाके हा विषय काहीसा वादग्रस्त आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके ही कल्पनाच चुकीची आहे. अवघ्या काही तासांत प्रचंड आवाज करणारे फटाके वाजवून त्याची राख होते. या फटाक्यांच्या आवाज आणि प्रकाशामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक यांना प्रचंड त्रास होतो. अन्य नागरिकांनादेखील श्वसनाचे विकार होतात. प्राणी, पक्षी आणि झाडांवरदेखील परिणाम होत असतो. त्यामुळे आता या विषयावर काही तरी निर्णय घेणे अपेक्षितच होते तो घेतला हे चांगले झाले.प्रश्न : ग्रीन फटाक्यांचा पर्याय कसा वाटतो? अनेकांना ग्रीन फटाके म्हणजे काय हेच माहिती नाहीये.प्राचार्य पवार : ग्रीन फटाके म्हणजेच पर्यावरणपूरक फटाके ही संकल्पना नवीन नाहीये. नागपूर येथील नॅशनल एन्व्हायर्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च युनिट म्हणजेच नीरीने याबाबत संशोधन केले आहे. केंद्र सरकारच्या सीआरएसआर संस्थेसह अन्य अनेक संस्थांनी संशोधन केले आहे. पारंपरिक फटाक्यातील अनेक प्रकारची रसायने यात नसतात. मुळात आवाजाचे हे फटाके नसतात. केवळ प्रकाश दिसतो. आकाशात गेल्यानंतरदेखील ते चांदणे होऊन कोसळताना दिसतात. त्यातून कमीत कमी प्रदूषण होते. अनेकदा विदेशातील कार्यक्रमात अशाप्रकारची आतषबाजी आपण बघतो. तोच हा प्रकार असतो, परंतु तो पर्यावरणपूरक असतो. आवाज नसल्याने ध्वनिप्रदूषण होत नाही. धूरही अत्यल्प असतो.प्रश्न : दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणखी काय सांगाल?प्राचार्य पवार : दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.मुलाखत: संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकenvironmentवातावरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCrackersफटाके