शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

कवडीमोल दरामुळे हिरवी मिरची उपटून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:50 IST

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे.

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण शेवाळे यांनी एक एकर मिरचीसाठी पाउण लाख खर्च करूनही सध्या कवडीमोल दरामुळे उत्पादन खर्चदेखील निघणार नसल्याने शेतातील मिरची उपटून फेकली आहे.खामखेडा परिसर हिरवी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी व्यापारी मिळत नसल्याने त्याचा परिणाम या भागातील भाजीपाला शेतातच सडू लागला आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण नारायण शेवाळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर लागवड करणे, मशागत, रासायनिक खते, औषधे फवारणी तसेच ड्रिप व मल्चिंग पेपरसाठी असा पाउण लाख रुपये खर्च केला होता.खामखेडा परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरची पिकाची लागवड केली जाते. मिरची या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. दिवसभर मिरची तोडून ती मालेगाव, धुळे, नवापूर, अमळनेर आदी मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्याच्या हाती पैसे येतो. तसेच गुजरात किंवा इतर राज्यांतील शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मिरची खरेदीसाठी येतो. यावर्षी सर्वत्र पाणी चांगले असल्याने या परिसरासह मिरची अधिक प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र, बाजार बंद असल्याने व सध्या दर नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिकांवर केलेला खर्च निघणेही कठीण झाल्याचे दिसून आल्याने अखेर शेवाळे यांनी एक एकर क्षेत्रावरील शेतातील उभ्या मिरचीचे पीक हतबल होत उपटून फेकले आहे. मिरचीला सध्या दोन ते तीन रुपये किलो बाजारभाव आहे.मिरची तोडणीसाठी झालेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याने व त्यातच आता पिक काढून टाकण्यासाठीही खर्च होणार असल्याने शेतकºयांवर लॉकडाउन दरम्यान मोठे संकट आल्याचे दिसून येत आहे.

-------------------------------------------------------

सध्या मिरची काढणी सुरु होती. काढणीसाठीचा खर्चदेखील सुटत नाही. बाहेरचे मार्केट बंद आहे, बाहेर माल घेऊन जाणेही अवघड आहे, त्यातच स्थानिक मार्केट नसल्याने मिरची उपटून फेकली आहे. लॉकडाउनचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.- हिरामण शेवाळे,मिरची उत्पादक, खामखेडा

टॅग्स :Nashikनाशिक