शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल दरामुळे हिरवी मिरची उपटून फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:50 IST

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे.

खामखेडा : सध्या लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्री करण्यात अनेक अडचणी येत असल्याने व चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतित आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण शेवाळे यांनी एक एकर मिरचीसाठी पाउण लाख खर्च करूनही सध्या कवडीमोल दरामुळे उत्पादन खर्चदेखील निघणार नसल्याने शेतातील मिरची उपटून फेकली आहे.खामखेडा परिसर हिरवी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी व्यापारी मिळत नसल्याने त्याचा परिणाम या भागातील भाजीपाला शेतातच सडू लागला आहे. खामखेडा येथील शेतकरी हिरामण नारायण शेवाळे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर लागवड करणे, मशागत, रासायनिक खते, औषधे फवारणी तसेच ड्रिप व मल्चिंग पेपरसाठी असा पाउण लाख रुपये खर्च केला होता.खामखेडा परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरची पिकाची लागवड केली जाते. मिरची या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. दिवसभर मिरची तोडून ती मालेगाव, धुळे, नवापूर, अमळनेर आदी मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्याच्या हाती पैसे येतो. तसेच गुजरात किंवा इतर राज्यांतील शेतकरी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मिरची खरेदीसाठी येतो. यावर्षी सर्वत्र पाणी चांगले असल्याने या परिसरासह मिरची अधिक प्रमाणावर लागवड झाली आहे. मात्र, बाजार बंद असल्याने व सध्या दर नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिकांवर केलेला खर्च निघणेही कठीण झाल्याचे दिसून आल्याने अखेर शेवाळे यांनी एक एकर क्षेत्रावरील शेतातील उभ्या मिरचीचे पीक हतबल होत उपटून फेकले आहे. मिरचीला सध्या दोन ते तीन रुपये किलो बाजारभाव आहे.मिरची तोडणीसाठी झालेला खर्चही निघणे कठीण झाले असल्याने व त्यातच आता पिक काढून टाकण्यासाठीही खर्च होणार असल्याने शेतकºयांवर लॉकडाउन दरम्यान मोठे संकट आल्याचे दिसून येत आहे.

-------------------------------------------------------

सध्या मिरची काढणी सुरु होती. काढणीसाठीचा खर्चदेखील सुटत नाही. बाहेरचे मार्केट बंद आहे, बाहेर माल घेऊन जाणेही अवघड आहे, त्यातच स्थानिक मार्केट नसल्याने मिरची उपटून फेकली आहे. लॉकडाउनचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.- हिरामण शेवाळे,मिरची उत्पादक, खामखेडा

टॅग्स :Nashikनाशिक