शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

द्राक्षे गेली कांदा चाळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:03 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात थांबल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत असून, अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांवर आता अनेकांकडून कुºहाड चालविली जात आहे. त्यातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी तर लाखो रुपयांचा द्राक्षमाल फेकायचा कुठे या विवंचनेत तो चक्क कांदा चाळीत, घराच्या गच्चीवर तसेच शेतात पसरून दिला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा तडाखा : बेदाणाही करणे बनले अवघड

लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्यात थांबल्याने द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान होत असून, अवकाळी पावसानंतर द्राक्ष बागांवर आता अनेकांकडून कुºहाड चालविली जात आहे. त्यातच द्राक्षे फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी तर लाखो रुपयांचा द्राक्षमाल फेकायचा कुठे या विवंचनेत तो चक्क कांदा चाळीत, घराच्या गच्चीवर तसेच शेतात पसरून दिला आहे.व्यापारी खरेदी बंद असल्याने द्राक्षे पिक काढणी करून पडून आहे. त्याला व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळेनासा झाला आहे, तर कवडीमोल दर मिळत असल्याने त्याचा वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांकडून खुडव्याला आलेल्या द्राक्षांच्या बागांवर कुºहाड चालवली जात आहे, तर काही शेतकºयांनी त्याच्या बेदाणा तयार करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु, त्यासाठी लागणाºया साधनांचीही अनुलब्धता असल्याने बेदाणा करणेही अवघड होऊन बसले आहे. निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदार वसंत दामू जाधव यांनी आपल्या शेतातील द्राक्षे शेतात, कांदा चाळीत व घराच्या छतावर टाकून दिली आहेत.या पिकाची इतरत्र विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने ते वेलीवर पाच महिने ठेवले तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पिकास मुकावे लागणार आहे. त्यामुळे वेलीवरून पीक काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.सदर पीक तयार करणेस अंदाजे पाच ते सहा लाख रुपये खर्च झाल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात ४० टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या निर्णया मुळे निर्यात व्यवस्था अडचणीत आली आहे. वास्तविक शासन ज्या सुरक्षिततेच्या उपाय योजना सांगत आहे त्या निर्यातदार गेल्या काही दशकांपासून करत आहे. कोरोना काही दिवसांत संपेल मात्र अवघ्या काही दिवसांचा शिल्लक असलेला द्राक्ष हंगाम पुन्हा सुरु होणार नाही व याचा फटका शेतकºयांना अनेक वर्ष सोसावा लागणार आहे.- सुरेश कळमकर, द्राक्ष निर्यातदारद्राक्षबागांवर चालविली कुºहाडदिंडोरी : मोहाडी येथील नारायण एकनाथ जाधव या शेतकºयाने सुमारे तीनशे क्विंटल द्राक्ष असलेली दोन एकर द्राक्षबाग पंधरा दिवसांपासून विक्र ीसाठी तयार ठेवली होती. मात्र कोरोनाच्या हाहाकारामुळे द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी फिरकत नाही. त्यातच बेदाणे बनविण्याचा विचार समोर आला तर त्यासाठी आवश्यक असणारी औषधे मिळत नसल्याने शेवटी जड अंत:करणाने मोठ्या कष्टाने उभी केलीली द्राक्षबाग जाधव यांनी उभ्या पिकासह तोडून टाकली आहे. नारायण जाधव यांची एक बाग वीस दिवसांपूर्वीच बेदाण्याला दिली आहे. त्याचीही एक दमडीही त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही. यामुळे आता त्यांच्यावर असलेले सुमारे दहा लाखांचे कर्ज, हातउसने, पावडरवाल्याची उधारी, द्राक्ष मजुरांची मजुरी व पाच-सहा जणांचे कुटुंब यांचा चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र