शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:02 PM

सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

ठळक मुद्देप्रभाग रचना व आरक्षण अंतिम करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व अंतिम प्रभाग रचना दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. यावरून आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजणार असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्चला ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते.यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्यानिवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाचीनियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. आता राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या.आता मात्र निवडणुकीची प्रक्रिया पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठीपुढचे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काहीमहिने वाट पहावी लागणार आहे.परिणामी ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विशेष म्हणजेयावेळी निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळी राहणार आहे.चौकट : सिन्नर तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आँगस्ट महिन्यात संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन प्रभाग रचना व वार्ड निहाय आरक्षण काढण्यात आले आहे. त्यानतंर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकतीचीही सुनावणी झालेली आहे. त्यानतंर सदरचे प्रस्ताव मान्यतेसाठी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित केल्या होत्या.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक