शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:13 IST

सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

ठळक मुद्देप्रभाग रचना व आरक्षण अंतिम करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देणे याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व अंतिम प्रभाग रचना दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. यावरून आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजणार असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्चला ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते.यामुळे तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्यानिवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाचीनियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. आता राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या.आता मात्र निवडणुकीची प्रक्रिया पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठीपुढचे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काहीमहिने वाट पहावी लागणार आहे.परिणामी ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विशेष म्हणजेयावेळी निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळी राहणार आहे.चौकट : सिन्नर तालुक्यातील 98 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आँगस्ट महिन्यात संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन प्रभाग रचना व वार्ड निहाय आरक्षण काढण्यात आले आहे. त्यानतंर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकतीचीही सुनावणी झालेली आहे. त्यानतंर सदरचे प्रस्ताव मान्यतेसाठी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका स्थगित केल्या होत्या.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक