शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:35 IST

डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच मुक्कामी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय असतानाही मुलांचे शिक्षण वा तत्सम कारणे दाखवून तालुका, जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंघटनांचा विरोध; नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत

सायखेडा : डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच मुक्कामी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय असतानाही मुलांचे शिक्षण वा तत्सम कारणे दाखवून तालुका, जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा याबाबत आदेश पारित करण्यात आला आहे.राज्य शासनाचे अवर सचिव प्रियदर्शन कांबळे यांनी नुकताच तसा आदेश पारित केला आहे. सदर शासन निर्णयात आता डॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव सादर करावा असे निर्देश दिले आहे. त्यामुळे मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सर्व विभागाच्या कर्मचारी संघटनांकडून या आदेशाला विरोध केला जात आहे. मुख्यालयी राहणे या संदर्भात अनेकवेळा शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे; मात्र ग्रामीण भागात घरे आणि इतर भौतिक सुविधा उपलब्ध होत नाही. शिवाय शासनाकडून शासकीय घरे ग्रामीण भागात बांधण्यात आले नाही. पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्याने त्यांचे अंतर आणि प्रवासाची साधने खेड्यात वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे वेळेवर मुख्यालयात पोहोचू शकत नाही, वृद्ध आई वडील यांच्या आरोग्याच्या समस्या असल्याने त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, अशा अनेक कारणांमुळे कर्मचारी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. शासनाच्या या आदेशाने नागरिकांमधून स्वागत केले आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक, आरोग्याचा आणि ग्रामविकासाचा वेग वाढवायचा असेल तर मुख्यालयी रहाणे गरजेचे आहे. खेड्यात अनेकवेळा रात्री-अपरात्री आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. सर्पदंश, महिला प्रसूती अशावेळी मुख्यालयी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होते.मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव द्यायचा असल्याने असा ठराव मिळविण्यासाठी कर्मचाºयांना सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संपर्कसाधावा लागणार आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, पण दाखला गरजेचा आहे. अशावेळी कोणत्या तरी मार्गाने दाखला मिळविण्यासाठी कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड लागणार आहे. अनेक ठिकाणी पैशांची देवाणघेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अर्जुन ताकाटे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघत्यामुळे कर्मचाºयांनी मुख्यालयी राहावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. सक्तीचा शासन निर्णय निघाल्याने नागरिक आनंदी झाले आहेत. मात्र कर्मचारीवर्ग या निर्णयाला कडकडीत विरोध करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार