शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यातील वैभवशाली कॉँग्रेसला लागले ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:00 IST

१९७२ च्या निवडणुकीत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसला मात्र नंतरच्या पंचवार्षिक म्हणजेच १९७७ मध्ये सपाटून मार खावा लागला. त्याचा परिणाम नाशिक या पारंपरिक कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर झाला. नाशिक विधानसभा मतदारसंघावर तोपर्यंत अपवाद वगळता कॉँग्रेसचा झेंडा घट्ट रोवला गेला होता.

नाशिक : १९७२ च्या निवडणुकीत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसला मात्र नंतरच्या पंचवार्षिक म्हणजेच १९७७ मध्ये सपाटून मार खावा लागला. त्याचा परिणाम नाशिक या पारंपरिक कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर झाला. नाशिक विधानसभा मतदारसंघावर तोपर्यंत अपवाद वगळता कॉँग्रेसचा झेंडा घट्ट रोवला गेला होता.नाशिक जिल्ह्यातील १४ जागांपैकी कॉँग्रेसला बागलाण, इगतपुरी, दिंडोरी आणि दाभाडी या अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी कॉँग्रेसची फूट हेदेखील पराभवाचे आणखी एक कारण होते. १९८० मध्ये राज्याला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले. १९७८ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्याच प्रयत्नात निवडून आलेले वसंत उपाध्ये यांना कॉँग्रेसच्या लाटेत पराभव पत्करावा लागला. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला, मात्र बंडखोर अपक्ष (स्व.) शांतारामबापू वावरे हे निवडून आले. १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुलोदची (पुरोगामी लोकशाही दल) मोट बांधली. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने १४ आमदार पुलोदचे निवडून दिले. १९९० च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पंडितराव खैरे यांचा पराभव झाला. १९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यात कॉँग्रेसला जेमतेम जागांवर समाधान मानावे लागले; मात्र पारंपरिक दाभाडी, दिंडोरी, कळवण, येवला आदी मतदारसंघांवर कॉँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले.२०१४ मध्ये दोन जागांवर समाधान२००४ मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. दोन्ही कॉँग्रेसने या निवडणुकीत समजूतदारपणाची भूमिका घेऊन युती केली असली तरी, राष्टÑवादीची जिल्ह्यात फारशी मदत कॉँग्रेसला होऊ शकली नाही. त्यामुळे कॉँंग्रेसला दोन जागांवरच समाधान मानावे लागले. एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसचे वैभव हळूहळू लयास गेले. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या मालेगाव मतदारसंघात कॉँग्रेसने आलटून पालटून आपले वर्चस्व कायम ठेवले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने इगतपुरी मतदारसंघावर पहिल्यांदाच झेंडा रोवला. या निवडणुकीत कॉँग्रेसला दोनच जागा मिळाल्या, २०१४ च्या निवडणुकीतही यापेक्षा काही वेगळे घडले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस