शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

७४ कोटींच्या कामांतून ११८ गावांत स्वच्छ भारतची झलक

By धनंजय रिसोडकर | Updated: November 21, 2023 18:11 IST

या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे

धनंजय रिसोडकर, नाशिक: जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील काही गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून गावांचा कायापालट करण्याचा प्रयास केला जाणार आहे. जिल्ह्यातील ५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११८ गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे होणार आहेत. त्यासाठी ७४.११ कोटींच्या कामांचे विकास आराखडे तयार झाले आहे. या कामांची निविदा प्रक्रिया राबवून कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने ‘स्वच्छ भारत मिशन’चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषदेला निधी आला आहे. या टप्प्यात सुरुवातीला ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११८ गावांच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या ७४ कोटींच्या कामांचा आराखडा तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात नदीकाठच्या गावांना प्राधान्य दिल्याचे सांगण्यात येते.

या गावांमधील कामाचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत पाच हजारांखालील लोकसंख्या असलेल्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ६०, तर सांडपाण्यासाठी २८० रुपयांप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ५ हजारांवरील लोकसंख्येच्या गावांत घनकचऱ्यासाठी प्रतिव्यक्ती ४५ रुपये; तर सांडपाण्यासाठी ६६० रुपयांप्रमाणे निधी दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने या कामांचे विकास आराखडे तयार करून त्यांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक