शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 18:08 IST

‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देभाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊशेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे मोदी सरकार जाती-धर्माचे विष कालवणारे म्हणून लोकांपुढे आले.

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समतेचे पाईक नसून विषमतेला खतपाणी घालणारे आहे. कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून लोकांपुढे आले. आगामी स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा मेळाव्यात पुकारला.‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, खंडेराव पाटील, किशोर दमाळे, अ‍ॅड. विजय मोरे, बाजीराव तिडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव यांसह विविध बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी समाजबांधवांनी ‘बोलो-बोलो जय भीम’चा नारा बुलंद करत अवघे सभागृह दणाणून सोडले. यावेळी आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांचे होणारे भाषण हे महत्त्वाचे असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अन् देशातील वातावरण अस्थिर करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र स्वातंत्र्यदिनानंतर भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊ.

मोदींनी या देशातील शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे आहे; कारण या सरकारने अंदाजपत्रकात अन्नधान्य खरेदीसाठी तशी कुठलीही तरतूद केलेली नाही. जेव्हा या देशातील शेतक-यांना हे लक्षात येईल, की सरकारने रंगविलेले हमीभाववाढीचे स्वप्न भंगले आहे, तेव्हा केंद्राकडून लोकसभेची निवडणूक जाहीर केली जाईल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आश्वासनांची खैरात आणि विषमता पोसणारे मनुवादी व्यवस्थेला खतपाणी घालणारे सरकार उधळून लावण्याचे महत्त्वाचे कार्य बहुजनांना करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNashikनाशिक