शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

...तर भावीपिढी वनौषधी ओळखणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:31 AM

नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी पिढीला वनौषधीची कुठलीही ओळख नसेल, अशी खंत सेवानिवृत्त वनधिकारी व वनौषधीच्या अभ्यासक कुसुम दहीवेलकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदहीवेलकर : रोटरीच्या कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी पिढीला वनौषधीची कुठलीही ओळख नसेल, अशी खंत सेवानिवृत्त वनधिकारी व वनौषधीच्या अभ्यासक कुसुम दहीवेलकर यांनी व्यक्त केली.रोटरी क्लबच्या वतीने गंजमाळ येथील सभागृहात मंगळवारी (दि.१७) दहीवेलकर यांची व्याख्यानपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘वनौषधी-आरोग्य अन् वृक्षलागवड’ या विषयावर बोलताना दहीवेलकर यांनी विविध भारतीय प्रजाती व त्यांची योग्य ठिकाणी लागवड आणि आयुर्वेदात त्यांचा औषधी उपयोग याविषयी मार्गदर्शन केले. दृकश्राव्य यंत्राच्या सहाय्याने त्यांनी विविध जीवनावश्यक औषधी वनस्पती व त्यांचे औषधी गुणधर्मांची ओळख उपस्थिताना करून दिली. निरगुडी, कडुनिंबाच्या पानांची वाफ बाळांतीण महिलेच्या खोलीत ठेवल्यास तिचे आरोग्य व आजूबाजूचा परिसर निर्जंतुक राहण्यास मदत होते. तसेच समुद्रसोष व पारिजातक या वनस्पतीच्या पानांचा उपचार सांधेदुखीवर रामबाण उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. मानवाची पचनसंस्था उत्तम राहिल्यास आरोग्याच्या तक्रारीही उद्भवत नाही. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यासाठी आवळा-बेहडा-हिरडा या झाडांच्या फळांपासून तयार करण्यात आलेल्या त्रिफळा चूर्ण पचनसंस्थेच्या तक्रारी दूर करण्यास सहायक ठरते.हिरड्याचे संस्कृतमधील नाव हरितकी असून, त्याचा अर्थ आई असा होतो. या शब्दावरून हिरडा मानवी आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे, याचा सहज अंदाज बांधता येईल, असे दहीवेलकर यावेळी म्हणाल्या. हिरड्याचे कोवळे फळ बाळहिरडा, तर परिपक्व झालेल्या फळाला सुरवाई हिरडा असे म्हटले जाते. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष राधेय येवले यांनी केले व आभार मुग्धा लेले यांनी मानले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रHealthआरोग्य