शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

११ हजार उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:18 AM

नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील ...

नाशिक: जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमविणाऱ्या ११ हजार ५४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यातील १९५२ मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत सरासरी ७० टक्के इतके मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला मात्र तत्काळ यंत्रे बदलून देण्यात आली. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सोमवार दि. १८ रोजी तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५५ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने उर्वरित ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील १० लाख ९६ हजार १६२ मतदारांपैकी सुमारे ७ लाख ५३ हजार २८१ मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६८.८७ टक्के इतके मतदान झाले. सायंकाळपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. महिला मतदार आणि वयोवृद्धांचा मतदानासाठीचा उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत सर्वत्र शांततेत मतदान सुरू असतांना जिल्ह्यातील अनेक भागात मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बदलून देण्याची वेळ आली.

--इन्फो--

त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरीत ८० टक्के पेक्षा अधिक मतदान

त्र्यंबकेश्वर येथील तीन, दिंडोरीतील ५३ तर इगतपुरीतील ७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात मतदारांचा उत्साह अधिक दिसून आला. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. मात्र इगतपुरी, दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत ८० टक्केच्या पुढे मतदान झाले होते. सायंकाळी ५.३० पर्यंत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेनुसार येथील आकडेवारी इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक असू शकते.

--इन्फो--

३३ केंद्रांवर ईव्हीएम बदलले

जिल्ह्यातील एकूण १९५२ मतदान केंद्रांपैकी ३३ मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाला. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. येथील मतदान यंत्रे बदलण्याची वेळ आली. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीसाठी २५६० कंट्रोल युनिट तसेत २५६० ईव्हीएम यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ५०० अतिरिक्त यंत्रे ठेवण्यात आली होती.

--कोट--

निवडणूक शांततेत

संपूर्ण जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडली. दिवसभरात काही ठिकाणी ईव्हीएम बाबत तांत्रिक अडचण आल्याने वेळेत मशीन्स बदलून देण्यात आली. त्यामुळे कुठेही मतदानात खंड पडला नाही. प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.