शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

जलयुक्त योजनेचा आटला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:11 AM

डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकामे पुढे सरकेना : कामे पूर्ण करण्याची कसोटी

नाशिक : डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीसह, लघुपाटबंधारे, कृषी अशा अन्य विभागांच्या लेखाशिर्षमधून निधी दिला जातो. परंतु सदर निधी अत्यल्प असल्यामुळे उत्तर महाराष्टÑातील कामे गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत पुढे सरकणे कठीण होऊन बसले आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागत असल्याने उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८३८ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या कामांसाठी निधीची तरतूद केलेली नाही. या कामांसाठी अन्य स्त्रोताच्या माध्यमातून मिळणाºया निधीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांमधील कामांचे भवितव्य अंधारात आले आहे.फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नाशिक जिल्ह्यात ७० कामे, धुळे जिल्ह्यात १९७, नंदुरबार जिल्ह्यातील ४५६, जळगावमधील ७१८, तर नगर जिल्ह्यातील ३८ याप्रमाणे १४७९ कामांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कामाची संथ गतीचार महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याचे काम ९८ टक्के झाले होते ते फेब्रुवारी १४ पर्यंत ९९ टक्के, धुळे जिल्ह्याचे काम ८६ वरून ८८, नगर जिल्ह्यातील काम ९९ टक्के असलेले काम कायम आहे. जळगाव ८२ टक्केवरून ८३ टक्के, तर नंदुरबार ७६ वरून ७९ टक्केइतकेच पुढे सरकले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवार