शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वणीजवळ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:27 IST

सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.

पंचवटी /वणी : सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.रविवारी पंचवटीतील काही भाविक सप्तशृंगगडावर नवसपूर्तीच्या धार्मिक विधीसाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना वणीजवळ कृष्णगाव शिवारात या भाविकांच्या आयशर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यावेळी चालकाने आयशर ट्रक रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली; मात्र काही भाविक खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने (एमएच १५ एव्ही १९५५) त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आयशर वाहन सुमारे २५ फूट पुढे जाऊन रस्त्याच्याकडेला उलटले. या धडकेत चार भाविक जागीच ठार झाले, तर इतर वीस ते पंचवीस भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष, महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.जखमींवर वणी रुग्णालयात उपचारअपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तिघे युवक हे पंचवटीतील पेठरोड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर अशोक ठाकूर (२३), कुणाल कैलास ठाकूर (२५), गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (३०) व त्र्यंबकेश्वर येथील आशिष माणिक ठाकूर (३०) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींनावणी येथील ग्रामीण रु ग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू