शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हृदयद्रावक! नव वधू-वरांवर अक्षता टाकून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाची झडप, चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:49 IST

पंडित मोरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी जालना जिल्ह्यातील हतवण येथे पार पडला. या सोहळ्यासाठी गौतमनगर, चुंचाळे शिवारातील रहिवासी ...

पंडित मोरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी जालना जिल्ह्यातील हतवण येथे पार पडला. या सोहळ्यासाठी गौतमनगर, चुंचाळे शिवारातील रहिवासी आयशर ट्रकमधून वऱ्हाडी म्हणून शनिवारी नाशिकमधून निघाले होते. मोरे कुटुंबियांचा लग्न सोहळा आटोपून सर्व वऱ्हाडी मंडळी रविवारी मांडवातून परतीच्या प्रवासाला लागली. औरंगाबाद ओलांडल्यानंतर वैजापूर तालुक्यात शिवराई गावाजवळ रविवारी त्यांच्या आयशर गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडींना मोठा हादरा बसला. या भीषण अपघातात गौतमनगर व चुंचाळे घरकुल या दोन्ही भागांतील पाच रहिवाशांसह आयशर ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन महिलांसह बालक ठार

ललिता पवार, कविता वडमारे, प्रज्ञा गायकवाड या तीन महिलांसह नवरदेवाचे वडील पंडित मोरे तसेच सात वर्षाचा चिमुरडा मोनू वाहुळे याचा मृतांमध्ये समावेश आहे. आयशरचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही. सोमवारी रात्री चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गौतमनगर, चुंचाळे भागात मृतदेह त्यांच्या नातेवाईकांद्वारे आणण्यात येत होते. या परिसरात सन्नाटा पसरला असून, येथील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेत ३० वऱ्हाडी जखमी

या भीषण दुर्घटनेत २५ ते ३० वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती उशिरापर्यंत हाती आली होती. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वैजापूरच्या जिल्हा रुग्णालयासह घाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील सोमवारी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गौतमनगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकर घरकुल परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक