शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

माजी मंत्री ए. टी. पवार यांचे मुंंबईत निधन

By admin | Updated: May 11, 2017 02:47 IST

कळवण : माजी आदिवासी विकासमंत्री व आठ वेळा कळवण मतदारसंघाची आमदारकी भूषविलेले अर्जुन तुळशीराम तथा ए. टी. पवार (७९) यांचे बुधवारी सकाळी बॉम्बे हॉस्पिटल येथे अल्प आजाराने निधन झाले.

 लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : माजी आदिवासी विकासमंत्री व आठ वेळा कळवण मतदारसंघाची आमदारकी भूषविलेले तसेच पाणीदार नेतृत्व म्हणून सुपरिचित असलेले अर्जुन तुळशीराम तथा ए. टी. पवार (७९) यांचे बुधवारी सकाळी साडेसात वाजता बॉम्बे हॉस्पिटल येथे अल्प आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता दळवट या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.आदिवासी भागात विकासाभिमुख कार्य करणारे पाणीदार नेतृत्व म्हणून पवार यांची महाराष्ट्रभर ओळख होती. कळवण या आदिवासी विधानसभा मतदारसंघाचे आठ वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी आदिवासी विकास, समाजकल्याण, बांधकाम, वन व पशुसंवर्धन, रोजगार व स्वयंरोजगार या खात्यांची राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडली. त्यांनी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली. आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करण्यातही त्यांचा सहभाग होता. त्या माध्यमातून त्यांनी सुमारे ३०० आश्रमशाळांना मंजुरी दिली होती. चणकापूर धरण, अर्जुनसागर (पुनंद), धनोली प्रकल्प, भेगू, ओतूर, बोरदैवत, चिंचपाडा, गोबापूर, मार्कंडपिंप्री, मळगाव, नांदुरी या लघुपाटबंधारे योजनांसह २३ छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव, कोल्हापूर बंधारा या सिंचन योजना मार्गी लावल्यामुळे सिंचनात वाढ झाली आहे. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी अनेक शासकीय कार्यालये कळवणमध्ये कार्यान्वित करून दिली. नाशिक जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी पक्षबांधणीसाठी मोठे योगदान दिले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तापी विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने नाशिक येथील डॉ. गुप्ते यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्या आठवड्यापासून त्यांना अधिक उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, प्रवीण पवार या दोन मुलांसह मुली डॉ. विजया भुसावरे व गीता गोळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, सदस्य डॉ. भारती पवार या स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. मान्यवरांकडून अंत्यदर्शन दुपारी साडेचार वाजता पवार यांचे पार्थिव नाशिक येथील गंगापूररोडवरील ‘अर्जुन सागर’ निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयंत जाधव, डॉ. राहुल अहेर, माजी खासदार प्रताप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.