शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

अज्ञानाच्या आवरणामुळे आत्मरूप अस्पष्ट :महंत रामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 7:01 PM

मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला.

येवला : मनाचा गढूळपणा, चंचलपणा, मलिनता आणि अज्ञानाचे आवरण गेल्याशिवाय आत्मरूप स्पष्ट दिसत नाही. त्यासाठी संतसंगती घडावी लागते. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. संत योग्यतेप्रमाणे उपदेश देतात. चंद्रावर डाग आहेत; पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो; पण तो दाहक आहे, तर संत ज्ञानाचा प्रकाश देतात; परंतु ते दाहक नाहीत. संतांचे सान्निध्य असेल तर मनुष्य स्थितप्रज्ञ बनू शकतो, असा हितोपदेश महंत रामगिरी यांनी दिला. तळवाडे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी पाचव्या प्रवचनाचे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर येवला पंचायतचे सभापती रूपचंद भागवत, ह.भ.प. मधू महाराज उपस्थित होते.आपल्या विवेचनात महंत रामगिरी यांनी, देव नाही म्हणणाऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. अग्नी लाकडात असतो, पण घर्षण झाल्याशिवाय दिसत नाही, दुधात तूप असतेच पण ते दुधाचे दही लोणी केल्यावरच दिसते. ब्रह्म जाणण्यासाठी मतिमंदता चालत नसते. थोडे संकट आले तर लोक विचारतात देव आहे कुठं? पण देव ही काही सामान्यरूपात दिसण्याची गोष्ट नाही. देव अनुपेक्षा छोटा आणि ब्रह्मांडापेक्षा मोठा आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम