शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 15:22 IST

कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देआपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवासद्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी

नाशिक : शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे अद्यापही पायी प्रवास करत दाखल होत आहे. मध्यप्रदेशसह अन्य राज्यांत जाणारे हे लोंढे रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. राज्य सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतांश प्रवासी मजूर आपला बिºहाड घेत पायपीट करताना दिसून येत आहेत. काही मजूर ‘डिस्टन्स’ बाजूला ठेवत मिळेल त्या मालवाहू वाहनांमधूनही प्रवास करत आहेत.कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या या जमातीने आपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या मजूरांचा प्रवास काहीसा जीवघेणाही ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मालगाडीच्या अपघाताने अवघे राज्य नव्हे तर देश हादरला. ‘पटरी पर जिंदगी आते आते, मौत ही आ गयी’ असे ही दुर्घटना सांगून गेली.करोना विषाणूच्या महामारीमुळे कष्टकरी मजुरांचा जगण्याच संघर्ष सुरू आहे. जवळचे पैसे संपले, हाताचा रोजगार गेला, मग, परराज्यात थांबून करणार तरी काय? या प्रश्नाचे मनात काहूर उठले अन् आपल्या घराची ओढ अधिकच अस्वस्थ करणारी ठरू लागली. संसाराचा बि-हाड बांधून ही मंडळी डोक्यावर घेत मुळ गावाच्या प्रवासाला लागली.नाशिक जिल्ह्यातून मार्गस्थ होणा-या या मंडळींची कुठल्याहीप्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरीपासून तर थेट चांदवडपर्यंत ठिकठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर या मजुरांना भोजन, पाणी पुरविले जात आहेत. सरकारने सुध्दा आता प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्याच्या वेशीपर्र्यंत थेट ‘लालपरी’ मोफत उपलब्ध केली आहे; मात्र तरीदेखील मजूरांची पायपीट सुरूच आहे. तसेच मिळेल त्या वाहनाने हे मजूर प्रवसाला लागले आहेत. दरम्यान, परस्परांमधील ‘डिस्टन्स’बाबतदेखील उदासिनता मजुरांमध्ये दिसून येत आहे. काही लोक मास्क बांधत आहेत, तर काही मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पायपीट करणारे मजुरांचे जत्थे नाशकात पोहचल्यानंतर गरवारे पॉइंट ते थेट जुना आडगावनाक्यपर्यंत असलेल्या उड्डाणपूलाच्या सावलीखाली हिरवळीवर विसावत असल्याचेही दृश्य आहे. शंभर दोनशे किलोमीटर पायपीट केल्यानंतर आलेला थकवा घालविण्यासाठी मजुर वर्ज उड्डाणपूलाच्या सावलीला असलेल्या दुभाजकांमधील जागेत झोप काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळीदेखील ‘डिस्टन्स’चा मात्र या गोरगरीबांना विसर पडत असल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोकाही संभवतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये रवाना होणारे हे मजूर नाशिकच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर अधिकच सुखावल्याचे चित्र दिसते. नाशिककरांनी माणुसकी धर्म जोपासत या गोरगरीब थकलेल्या आपल्या भारतीय मजुरांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे काही मजुरांनी तर अशी मानवता आम्ही अद्याप कुठल्याही ठिकाणी बघितली नाही, यामुळे नाशिक सोडताना नक्कीच आम्हाला पुढचा प्रवास करण्याचे बळ लाभत आहे, अशाही भावना व्यक्त केल्या. इगतपुरीत या मजुरांना काही ठिकाणी मोफत पादत्राणेही वाटप करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅँकरसुध्दा उभे करण्यात आले आहे. द्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी लावण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकhighwayमहामार्गMadhya Pradeshमध्य प्रदेश