शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 15:22 IST

कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देआपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवासद्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी

नाशिक : शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे अद्यापही पायी प्रवास करत दाखल होत आहे. मध्यप्रदेशसह अन्य राज्यांत जाणारे हे लोंढे रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. राज्य सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली असली तरी बहुतांश प्रवासी मजूर आपला बिºहाड घेत पायपीट करताना दिसून येत आहेत. काही मजूर ‘डिस्टन्स’ बाजूला ठेवत मिळेल त्या मालवाहू वाहनांमधूनही प्रवास करत आहेत.कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या या जमातीने आपला संसार डोक्यावर घेत मुळ गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या मजूरांचा प्रवास काहीसा जीवघेणाही ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मालगाडीच्या अपघाताने अवघे राज्य नव्हे तर देश हादरला. ‘पटरी पर जिंदगी आते आते, मौत ही आ गयी’ असे ही दुर्घटना सांगून गेली.करोना विषाणूच्या महामारीमुळे कष्टकरी मजुरांचा जगण्याच संघर्ष सुरू आहे. जवळचे पैसे संपले, हाताचा रोजगार गेला, मग, परराज्यात थांबून करणार तरी काय? या प्रश्नाचे मनात काहूर उठले अन् आपल्या घराची ओढ अधिकच अस्वस्थ करणारी ठरू लागली. संसाराचा बि-हाड बांधून ही मंडळी डोक्यावर घेत मुळ गावाच्या प्रवासाला लागली.नाशिक जिल्ह्यातून मार्गस्थ होणा-या या मंडळींची कुठल्याहीप्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. इगतपुरीपासून तर थेट चांदवडपर्यंत ठिकठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर या मजुरांना भोजन, पाणी पुरविले जात आहेत. सरकारने सुध्दा आता प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तसेच राज्य सरकारनेही या मजुरांना त्यांच्या गावांपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्याच्या वेशीपर्र्यंत थेट ‘लालपरी’ मोफत उपलब्ध केली आहे; मात्र तरीदेखील मजूरांची पायपीट सुरूच आहे. तसेच मिळेल त्या वाहनाने हे मजूर प्रवसाला लागले आहेत. दरम्यान, परस्परांमधील ‘डिस्टन्स’बाबतदेखील उदासिनता मजुरांमध्ये दिसून येत आहे. काही लोक मास्क बांधत आहेत, तर काही मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पायपीट करणारे मजुरांचे जत्थे नाशकात पोहचल्यानंतर गरवारे पॉइंट ते थेट जुना आडगावनाक्यपर्यंत असलेल्या उड्डाणपूलाच्या सावलीखाली हिरवळीवर विसावत असल्याचेही दृश्य आहे. शंभर दोनशे किलोमीटर पायपीट केल्यानंतर आलेला थकवा घालविण्यासाठी मजुर वर्ज उड्डाणपूलाच्या सावलीला असलेल्या दुभाजकांमधील जागेत झोप काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळीदेखील ‘डिस्टन्स’चा मात्र या गोरगरीबांना विसर पडत असल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोकाही संभवतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये रवाना होणारे हे मजूर नाशिकच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर अधिकच सुखावल्याचे चित्र दिसते. नाशिककरांनी माणुसकी धर्म जोपासत या गोरगरीब थकलेल्या आपल्या भारतीय मजुरांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे काही मजुरांनी तर अशी मानवता आम्ही अद्याप कुठल्याही ठिकाणी बघितली नाही, यामुळे नाशिक सोडताना नक्कीच आम्हाला पुढचा प्रवास करण्याचे बळ लाभत आहे, अशाही भावना व्यक्त केल्या. इगतपुरीत या मजुरांना काही ठिकाणी मोफत पादत्राणेही वाटप करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅँकरसुध्दा उभे करण्यात आले आहे. द्वारकासर्कलवरसुध्दा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी लावण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकhighwayमहामार्गMadhya Pradeshमध्य प्रदेश