शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

कोमेजलेल्या चेहऱ्यांवर फुलले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:51 IST

कळवण : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी पहिला लॉकडाउन जाहीर केला आणि सर्वांनाच आहे

कळवण : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी पहिला लॉकडाउन जाहीर केला आणि सर्वांनाच आहे तिथेच थांबण्याची सूचना केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शेकडो किलोमीटर दूरवरून आपल्या कुटुंबीयांसह आलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना अडकून पडावे लागले होते. मात्र, कळवण येथील नगरपंचायत प्रशासनाने मजुरांच्या अडचणी जाणून घेत त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केल्याने या कोमेजलेल्या या मजुरांच्या चेहºयावर हास्य फुलले.कळवण येथे रस्त्याच्या कामासाठी हिंगोली, गोंदिया, धुळे या जिल्ह्यातील २४ कुटुंब असलेले ५६ मजूर गेल्या तीन महिन्यांपासून आलेले होते, परंतु भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली आणि हे सारे मजूर आपल्या कुटुंबीयांसह अडकले. त्यानंतर लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला. लॉकडाउनमुळे सर्व कामे बंद ठेवण्यात आल्याने या मजुरांच्या राहण्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.कळवण नगरपंचायतीने जुन्या पंचायत समिती आवारात या मजुरांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हे मजूर या ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. परजिल्ह्यासह परराज्यात जाण्यास बंदी असल्याने या मजुरांना येथेच अडकून पडावे लागले होते. नुकतीच शासनाने काही अंशी नियमात शिथिलता देत अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या गावी परतण्याची मुभा दिली होती.या मजुरांकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांची अडचण वाढलेली असतानाच कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या प्रयत्नातून या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडीतून हिंगोली, गोंदिया व धुळे जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यातआले.दोन महिन्यांच्या कालावधीनंतर घरी परतता येत असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.--------------------------------------मजुरांची पालकाप्रमाणे काळजीरस्त्याच्या कामासाठी आलेल्या या मजुरांच्या २४ कुटुंबात बाया-बापड्यांसह त्यांची चिमुकली मुलेही होती. हाती पैसा नाही, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत लॉकडाउन जाहीर झाल्याने या कुटुंबीयांसमोर उदरभरणाचा यक्षप्रश्न निर्माण झालेला असताना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी राहण्याची व्यवस्था करून देत विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य, किराणा वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यांची पालकाप्रमाणे काळजी घेतल्याचे मजुरांनी सांगितले. गुरु वारी हिंगोली येथील मजुरांना रवाना करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, कर्मचारी योगेश पगार आदी उपस्थित होते.---------------------------दोन महिने झाले, घराकडे जाण्याची ओढ लागली होती, मात्र लॉकडाउन असल्याने जाता येत नव्हते. या कालावधीत नगरपंचायत प्रशासन व दानशूर व्यक्तींनी खूप मदत केली. घराकडे जात असल्याने आनंद वाटतो आहे.- नारायण गोरणर, मजूर, हिंगोलीदोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या मजुरांना वेळोवेळी शिधा व किराणा उपलब्ध करून दिला. या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी खासगी वाहन उपलब्ध करून देऊन हिंगोली, धुळे व गोंदिया येथे रवाना केले आहे.- डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी,कळवण नगरपंचायत

टॅग्स :Nashikनाशिक