शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

नांदगावला फुलांची विक्र ी घटली; उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:11 IST

नांदगाव : सकाळी दुकान उघडून साफसफाई करून देवाच्या फोटोला हार घातल्यानंतर, पैशांच्या गल्ल्याला फुले वाहून दैनंदिन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या शहरातील शेकडो दुकानदारांची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांच्या मागे दोन महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. मंदिरातल्या देवापेक्षा दुकानातल्या ‘देवां’वर अवलंबून असलेला फूलवाला आज कोमेजून गेला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : दुकाने, मंदिरे बंद असल्याने थांबली विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : सकाळी दुकान उघडून साफसफाई करून देवाच्या फोटोला हार घातल्यानंतर, पैशांच्या गल्ल्याला फुले वाहून दैनंदिन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या शहरातील शेकडो दुकानदारांची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांच्या मागे दोन महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. मंदिरातल्या देवापेक्षा दुकानातल्या ‘देवां’वर अवलंबून असलेला फूलवाला आज कोमेजून गेला आहे.शहरात फुलांची पंधरा ते वीस दुकाने आहेत. मात्र त्यांचे ग्राहक असलेली दुकाने बंद आहेत व विवाह समारंभ नाहीत. यामुळे ८० टक्क्यांपर्यंत फुलांची मागणी घटल्याची खंत महावीर मार्गावरचे कचरू त्रिभुवन यांनी व्यक्त केली. पेट्रोलपंप, मेडिकल, किराणा या दुकानांमुळे १० ते २० टक्के फूलविक्री होत आहे. दररोज विविध दुकानांसाठी ४०० ते ४५० छोटे हार विक्री होत असत. लग्नसराईत पाच ते दहा हजारांचा व्यवसाय होत असे. मात्र यंदा तेही नाही.भेंडी बाजार रस्त्यावरचे अण्णा बागुल यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. त्यांची आजी पार्वताबाई बागुल यांनी १९५२ सालात फुलांचा व्यवसाय जय मल्हार या नावाने सुरु केला होता. परंतु आजसारखी परिस्थिती कधीच आली नव्हती. गेल्या वर्षी पाणी कमी होते तरी उत्पन्न निघाले. विक्र ी बºयापैकी झाली. यंदा पाणी भरपूर आहे तर विक्री नाही, असे बागुल यांनी सांगितले.खर्च वजा जाता दररोज २०० ते ४०० रु पये नफा मिळून घरखर्च व इतर खर्च भागवला जात असे. गेल्या दोन महिन्यांपासून २० टक्के फूलव्रिकी होत आहे. असे असले तरी हेही दिवस जातील व पुन: एकदा फुलांच्या विक्रीला टवटवी येईल अशी अपेक्षा त्रिभुवन व बागुल यांनी व्यक्त केली.गुलाबाचा बाग छाटलागेल्या महिन्यातच दोन एकरच्या वर असलेला गुलाबाचा बाग गिºहाईक नसल्याने छाटावा लागला. नाग्यासाक्या धरणाजवळ त्यांची शेती असून, ते फक्त फुलांचीच शेती करतात. गुलाब, शेवंती, गिलाडा, झेंडू अशा विविध फुलांचे पीक ते घेतात. भाऊ, आई, वडील व बायका, मुले असा एकूण दहा सदस्यांचा परिवार आहे. यंदा मात्र धंद्याचा खेळच झाला, असे खेदाने बागुल म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक