शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:22 IST

जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना यंदा पहिल्यांदाच आॅक्टोबरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांमधील पाण्याची परिस्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मावळली आहे.जुलै महिन्यात उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात आपली हजेरी कायम ठेवली व यंदा दीडशे टक्क्यांहून अधिक मान्सून बरसला. एवढेच नव्हे, तर सप्टेंबरनंतरही पावसाने आपला मुक्काम वाढवून आॅक्टोबर अखेरपर्यंत जोरदार बरसला. गेल्या तीन ते चार दिवसांपासूनजिल्ह्णात सर्व दूर पाऊस पडत असून, त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने देशातून मान्सून परतल्याचे जाहीर करूनही अवकाळीपावसाने जिल्ह्यात थांबणेच पसंत केले. (पान ७ वर)जिल्ह्यातील धरणे आॅक्टोबरमध्येच फुल्ल(पान १ वरून)परिणामी जिल्ह्णातील लहान, मोठे सर्व धरणे शंभर टक्के भरले आहेत. गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची मुबलकता निर्माण झाली आहे.धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, नदी काठच्या गावांमधील विहिरीही काठोकाठ भरल्या आहेत. या पाण्यामुळे यंदा रब्बीचा हंगाम जोमात येण्याची शक्यता असून, त्याचबरोबर दरवर्षी डिसेंबरअखेरपासून जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व रब्बीच्या पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडण्याची होणारी मागणी करण्याची वेळ येणार नसल्याचे दिसू लागले आहे.जिल्ह्णात १५४ टक्केपाऊसयंदा पावसाने तब्बल चार महिने मुक्काम ठोकल्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्णात १५४ टक्के पावसाची नोंद सरकारी दप्तरात करण्यात आली आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर अखेर फक्त ८३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. यंदा सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात १९८ टक्के झाला आहे.जिल्ह्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, ६५,५३१ दशलक्ष घनफूट पाणी सध्या धरणांमध्ये साठले आहे. त्यामुळे धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जादा पाणी साठवणे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गौतमी गोदावरी, पालखेड, पुणेगाव, दारणा, भावली, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDamधरण