शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:22 IST

जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना यंदा पहिल्यांदाच आॅक्टोबरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांमधील पाण्याची परिस्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मावळली आहे.जुलै महिन्यात उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात आपली हजेरी कायम ठेवली व यंदा दीडशे टक्क्यांहून अधिक मान्सून बरसला. एवढेच नव्हे, तर सप्टेंबरनंतरही पावसाने आपला मुक्काम वाढवून आॅक्टोबर अखेरपर्यंत जोरदार बरसला. गेल्या तीन ते चार दिवसांपासूनजिल्ह्णात सर्व दूर पाऊस पडत असून, त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने देशातून मान्सून परतल्याचे जाहीर करूनही अवकाळीपावसाने जिल्ह्यात थांबणेच पसंत केले. (पान ७ वर)जिल्ह्यातील धरणे आॅक्टोबरमध्येच फुल्ल(पान १ वरून)परिणामी जिल्ह्णातील लहान, मोठे सर्व धरणे शंभर टक्के भरले आहेत. गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची मुबलकता निर्माण झाली आहे.धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, नदी काठच्या गावांमधील विहिरीही काठोकाठ भरल्या आहेत. या पाण्यामुळे यंदा रब्बीचा हंगाम जोमात येण्याची शक्यता असून, त्याचबरोबर दरवर्षी डिसेंबरअखेरपासून जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व रब्बीच्या पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडण्याची होणारी मागणी करण्याची वेळ येणार नसल्याचे दिसू लागले आहे.जिल्ह्णात १५४ टक्केपाऊसयंदा पावसाने तब्बल चार महिने मुक्काम ठोकल्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्णात १५४ टक्के पावसाची नोंद सरकारी दप्तरात करण्यात आली आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर अखेर फक्त ८३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. यंदा सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात १९८ टक्के झाला आहे.जिल्ह्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, ६५,५३१ दशलक्ष घनफूट पाणी सध्या धरणांमध्ये साठले आहे. त्यामुळे धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जादा पाणी साठवणे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गौतमी गोदावरी, पालखेड, पुणेगाव, दारणा, भावली, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDamधरण