शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:22 IST

जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना यंदा पहिल्यांदाच आॅक्टोबरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांमधील पाण्याची परिस्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मावळली आहे.जुलै महिन्यात उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात आपली हजेरी कायम ठेवली व यंदा दीडशे टक्क्यांहून अधिक मान्सून बरसला. एवढेच नव्हे, तर सप्टेंबरनंतरही पावसाने आपला मुक्काम वाढवून आॅक्टोबर अखेरपर्यंत जोरदार बरसला. गेल्या तीन ते चार दिवसांपासूनजिल्ह्णात सर्व दूर पाऊस पडत असून, त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने देशातून मान्सून परतल्याचे जाहीर करूनही अवकाळीपावसाने जिल्ह्यात थांबणेच पसंत केले. (पान ७ वर)जिल्ह्यातील धरणे आॅक्टोबरमध्येच फुल्ल(पान १ वरून)परिणामी जिल्ह्णातील लहान, मोठे सर्व धरणे शंभर टक्के भरले आहेत. गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची मुबलकता निर्माण झाली आहे.धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, नदी काठच्या गावांमधील विहिरीही काठोकाठ भरल्या आहेत. या पाण्यामुळे यंदा रब्बीचा हंगाम जोमात येण्याची शक्यता असून, त्याचबरोबर दरवर्षी डिसेंबरअखेरपासून जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व रब्बीच्या पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडण्याची होणारी मागणी करण्याची वेळ येणार नसल्याचे दिसू लागले आहे.जिल्ह्णात १५४ टक्केपाऊसयंदा पावसाने तब्बल चार महिने मुक्काम ठोकल्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्णात १५४ टक्के पावसाची नोंद सरकारी दप्तरात करण्यात आली आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर अखेर फक्त ८३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. यंदा सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात १९८ टक्के झाला आहे.जिल्ह्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, ६५,५३१ दशलक्ष घनफूट पाणी सध्या धरणांमध्ये साठले आहे. त्यामुळे धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जादा पाणी साठवणे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गौतमी गोदावरी, पालखेड, पुणेगाव, दारणा, भावली, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDamधरण