शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

मोसम खोऱ्यातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:15 IST

निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

शरद भामरे।स्थळ : मुळाणे-कौतिकपाडा रस्ता. वेळ : सकाळी १० वा.औंदाणे : निकृष्ट दर्जा, उखडलेले डांबर, उघडी पडलेली खडी अन् नामशेष झालेल्या साइडपट्ट्या अशी अवस्था बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह मोसम खोºयात गेल्या अनेक वर्षांपासून गावांना जोडणाºया अंतर्गत रस्त्यांची झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे खेड्यांमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मुळाणे ते कौतिकपाडा सुमारे तीन किलोमीटर रस्त्यावरील डांबर उखडले आहे. खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहेत व दुतर्फा काटेरी बाभळांनी वेढा घातल्याने साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. शेतकºयांनी रस्त्यालगत पिके घेतल्याने रस्ता छोटा होऊन रस्ता की पांधी अशी अवस्था आहे. तादुंळवाडी ते नांदीनकडे जाणाºया तीन कि.मी. रस्त्याचे हाल झाले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण नाही की निधीही मंजूर नाही. कच्चा रस्ता असल्याने खडी पूर्णत: उघडी पडली आहे. नांदीन ते पिसोळ किल्ला हा सुमारे दोन कि.मी. रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. खडी उघडी पडली आहे. हा रस्त्यावर पुरातन पिसोळ किल्ला असून, पर्यटकांची येथे वर्दळ असते. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.   तालुक्यातील काही भागात दोन-दोन, तीन-तीन कि.मी. अंतराचे रस्ते झाले आहेत. मात्र निकृष्ट दर्जामुळे दोनच वर्षांत डांबर उघडून रस्त्याची दुरवस्था झाली. उर्वरित रस्त्यांना निधी उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने हे रस्ते जैसे थे आहेत. हे सर्वच रस्ते वर्दळीचे आहेत. स्थानिक नागरिक व शेतकरी याच मार्गांवरून सटाणा व कळवण येथे शेतमाल नेतात. मात्र रस्ते ठिकठिकाणी उखडल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.  रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांनी अतिक्रमण केले आहे.त्यामुळे साइडपट्ट्या नामशेष झाल्या आहेत. झुडपांच्या अतिक्रमणामुळे वळणावर वाहने एकमेकांना न दिसल्यामुळे लहान -मोठे अपघात घडत आहेत. खराब रस्त्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माल वेळेवर बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र या सर्व गोष्टींचा सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीवर कुठलाही परिणाम होत नाही. या रस्त्यांवरु न पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय नसल्याने हे पाणी साचून ठिकठिकाणी रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता उखडून खडी वर आल्याने वाहने घसरणे, पंक्चर होणे, वाहनांचे पाटे तुटणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. लोकांना मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.वाहनधारकांचे हालजुनी शेमळी ते अजमीर सौंदाणे हा तीन किमी रस्ता छोट्या मोठ्या डोंगर पायथ्यापासून गेला आहे. या रस्त्याला निधी नसून लोकप्रति निधीही कधी ही इकडे फिरकले नसल्याने वाहनधारकांना खडी तुडवत धूळ अंगावर झेलत मार्गक्रमण करावे लागते. आदिवासी भागातील दूरवर मोरकुरे ते पठावे या चार किलोमीटर रस्त्याचे डांबर वर्षात उघडून गेले आहे. खडी उघडी पडल्याने वाहने पंक्चर होत आहेत. खड्ड्यांच्या प्रमाण वाढ झाली आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे वाहने नादुरुस्त होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. चालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा