शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे कोटींचा घोटाळा, थेट ईडीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:44 IST

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली आहे. मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भाजपाचे ज्येेेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी तक्रार केली आहे. ईडीने या प्रकारची गांर्भीयाने दखल घेतलीच तर देवीदास पिंगळे यांच्यावर सक्रांत असणार आहे.

ठळक मुद्देकृऊबात सध्या राष्ट्रवादीची सत्ता माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर संक्रांत

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली आहे. मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भाजपाचे ज्येेेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी तक्रार केली आहे. ईडीने या प्रकारची गांर्भीयाने दखल घेतलीच तर देवीदास पिंगळे यांच्यावर सक्रांत असणार आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. मात्र आता पुन्हा पिंगळे यांच्याच ताब्यात ही समिती आहे. त्यांच्या आणखी एका सत्ता स्थानाला म्हणजेच गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्याचे काम भाजपाचे ज्येेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराच्या विरोधात लढणारे सध्या भाजपचे शहर सरचिटणीस असलेले सुनील केदार यांनी एकत्र येऊन बुधवारी (दि.१२) बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली. महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यातील यंत्रणा निष्पक्षपणे चौकशी करतील अशी खात्री नसल्यानेच ही तक्रार थेय ईडीकडे करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१३-१४ या वर्षाातील लेखा परीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपातून सुमारे पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, असा दावा दिनकर पाटील आणि सुनील केदार यांनी केला आहे. लेखा परीक्षणासह अन्य कागदपत्रेही पुरावा म्हणून त्यांनी ईडीला सादर केली आहेत. गेली २० वर्षे पिंगळे यांच्याकडे सत्ता असून त्यामुळेच घेाटाळ्याचा एकंदर हिशेब बघितला तर अब्जावधी रूपयांचा घोटाळा आहे, असेही त्यात नमूद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शेतकरी तसेच बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या संबंधीतांच्या विरोधात कारवाई करावी असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस