शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे कोटींचा घोटाळा, थेट ईडीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:44 IST

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली आहे. मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भाजपाचे ज्येेेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी तक्रार केली आहे. ईडीने या प्रकारची गांर्भीयाने दखल घेतलीच तर देवीदास पिंगळे यांच्यावर सक्रांत असणार आहे.

ठळक मुद्देकृऊबात सध्या राष्ट्रवादीची सत्ता माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर संक्रांत

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट ईडी म्हणजेच सक्त वसुली संचालनालयाकडे भाजपाने तक्रार केली आहे. मुंबईत सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाऊन भाजपाचे ज्येेेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी तक्रार केली आहे. ईडीने या प्रकारची गांर्भीयाने दखल घेतलीच तर देवीदास पिंगळे यांच्यावर सक्रांत असणार आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती हे माजी खासदार पिंगळे यांचे वर्षानुवर्षे सत्तास्थान असून मध्यंतरी शिवसेनेत असलेले शिवाजी चुंभळे यांनी त्यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. मात्र आता पुन्हा पिंगळे यांच्याच ताब्यात ही समिती आहे. त्यांच्या आणखी एका सत्ता स्थानाला म्हणजेच गोदावरी कृषक संस्थेला आव्हान देण्याचे काम भाजपाचे ज्येेष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले, मात्र त्यात यश आले नाही. त्यातच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराच्या विरोधात लढणारे सध्या भाजपचे शहर सरचिटणीस असलेले सुनील केदार यांनी एकत्र येऊन बुधवारी (दि.१२) बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे केली. महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यातील यंत्रणा निष्पक्षपणे चौकशी करतील अशी खात्री नसल्यानेच ही तक्रार थेय ईडीकडे करण्यात आल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१३-१४ या वर्षाातील लेखा परीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेपातून सुमारे पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे, असा दावा दिनकर पाटील आणि सुनील केदार यांनी केला आहे. लेखा परीक्षणासह अन्य कागदपत्रेही पुरावा म्हणून त्यांनी ईडीला सादर केली आहेत. गेली २० वर्षे पिंगळे यांच्याकडे सत्ता असून त्यामुळेच घेाटाळ्याचा एकंदर हिशेब बघितला तर अब्जावधी रूपयांचा घोटाळा आहे, असेही त्यात नमूद असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शेतकरी तसेच बाजार समितीच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या संबंधीतांच्या विरोधात कारवाई करावी असेही तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस