शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:21 IST

अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच फेऱ्या पूर्णचार नियमित व एक विशेष फेरीत 16 हजार प्रवेश आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य पद्धतीने प्रवेश

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील ५८ महाविद्यावलयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून जवळपास ११ हजार विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रितून बाद झाले होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचीत राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार व विशेष एक फे री पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश प्र्रक्रिया सुरू केली आहे. या फेरीसाठी २५ आॅगस्टला विविध महाविद्यालयांतील रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे.अकरावी प्रवेशापासून आतापर्यंत वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थी डावलले जावू नये यासाठी ही फेरी तीन वेगवेगळ््या टप्प्यात होणार आहे. यात २७ आॅगस्टला पहिल्या टप्या ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. २८ आॅगस्टला दुसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. त्यानुसार २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असून  ३० आॅगस्टला तिसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबरला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय