शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:21 IST

अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच फेऱ्या पूर्णचार नियमित व एक विशेष फेरीत 16 हजार प्रवेश आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य पद्धतीने प्रवेश

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील ५८ महाविद्यावलयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून जवळपास ११ हजार विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रितून बाद झाले होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचीत राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार व विशेष एक फे री पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश प्र्रक्रिया सुरू केली आहे. या फेरीसाठी २५ आॅगस्टला विविध महाविद्यालयांतील रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे.अकरावी प्रवेशापासून आतापर्यंत वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थी डावलले जावू नये यासाठी ही फेरी तीन वेगवेगळ््या टप्प्यात होणार आहे. यात २७ आॅगस्टला पहिल्या टप्या ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. २८ आॅगस्टला दुसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. त्यानुसार २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असून  ३० आॅगस्टला तिसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबरला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय