शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरटीईच्या पहिल्या सोडतीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:44 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत  जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिलीच्या 2 हजार 917 विद्यार्थ्यांसह पूर्व प्राथमिकच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. पहिल्या फेरीत zशाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्याथ्र्याना पहिल्या सोडतीत प्राधान्य मिळाले आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यासाठी आरटीईची पहिली सोडत जाहीरपहिल्या फेरीत तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी पहिलीच्या 2917 व नर्सरीच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत  जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिलीच्या 2 हजार 917 विद्यार्थ्यांसह पूर्व प्राथमिकच्या 84 विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. पहिल्या फेरीत zशाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्याथ्र्याना पहिल्या सोडतीत प्राधान्य मिळाले आहे. त्याहून अधिक अंतर असलेल्या विद्याथ्र्याना पुढील सोडतीत संधी मिळणार आहे.  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्याथ्र्यासाठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यासाठी मंगळवारी (दि. 13) शासकीय कन्या शाळेत पहिली सोडत काढण्यात आली. चार विद्याथ्र्याच्या हस्ते 0 ते 9 क्रमांकाच्या चिठ्ठय़ा काढून संबंधित अंक संगणकीय यंत्रणोवर टाकून ऑनलाइन पद्धतीने ही लॉटरी काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतिन पगार, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, उपशिक्षणधिकारी राजीव म्हसकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. शिक्षण हक्क  कायद्यांतर्गत जिल्ह्यातील 466 शाळांमधील 6 हजार 589 जागांसाठी सुमारे दहा हजार 416 प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, यातील 3001 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर उर्वरित विद्याथ्र्यासाठी पहिल्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरी सोडत काढण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आरटीई कायद्यामुळे संधी मिळत असल्याने जिल्हाभरातून सुमारे 1क् हजार 416 विद्याथ्र्याच्या पालकांनी या प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी सोडत पद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्याच्या पालकांना त्यासंबंधीची माहितीही मोबाइल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर सर्व अर्ज करणाऱ्या विद्याथ्र्याच्या अर्जाची स्थितीही दिसणार आहे.  

पहिल्या सोडतीत बागलाण तालुक्यातील 102 अर्जाची निवड झाली असून, चांदवड 53, देवळा 61, दिंडोरी 58, इगतपुरी 97, कळवण 49, मालेगाव 13क्, नांदगाव 65, नाशिक 1क्5, निफाड 296, पेठ 8, सिन्नर 155, सुरगाणा 5, त्र्यंबकेश्वर 34, येवला नाशिक यूआरसी 1-665, मालेगाव कॅम्प 134 व नाशिक यूआरसी 2 मध्ये 896 विद्याथ्र्याच्या अर्जाची निवड झाली आहे. 28 ते 31 मार्चदरम्यान दुसरी सोडत  पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पालक 14 ते 24 मार्च या कालावधीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. या फेरीत संधी मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असणाऱ्या जागांसाठी दि. 28 ते 31 मार्च या कालावधीत दुसरी सोडत काढण्यात येणार असून, या फेरीत संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. 2 ते 12 एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकSchoolशाळा