उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:55 IST2020-12-23T21:34:31+5:302020-12-24T00:55:55+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक
ठळक मुद्देशेवटच्या तीन दिवसांत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
त्र्यंबक तालुक्यातील शिवाजीनगर, पेगलवाडी ना. व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दि.२३ ते ३० डिसेंबरपर्यंत (दि.२६ ते २८पर्यंतच्या सुट्या वगळता) आहे. शेवटच्या तीन दिवसांत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांत आज युवकांची संख्या अधिक दिसून आली.