शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खासगी वाहनधारकांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:33 IST

मालेगाव : तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ठाण मांडल्याने शहरातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मालेगाव : तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ठाण मांडल्याने शहरातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.टॅक्सी सेवा बंद असल्याने पाचशेहून अधिक वाहनचालक बेरोजगार झाले आहेत. वाहतूक कधी पूर्ववत सुरू होते याकडे लक्ष लागले आहे. मालेगाव शहरात सुरुवातीस कोरोनाने हाहाकार केला होता. त्यामुळे शहर दहशतीखाली होते. सर्व शहर ठप्प झाले तर उद्योगधंद्यांना टाळे लागले होते. सध्या शहराची स्थिती सामान्य होत आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. काही व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योगधंद्यांनी उभारी घेतली आहे; पण प्रवासी बस वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठी झळ बसत आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा मालेगावहून मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन भाडेतत्त्वावर घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवासखर्च दहापटीने वाढला आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या फिजिकल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमानुसार तीन ते चार प्रवाशांची वाहतूक करत आहेत. मात्र टॅक्सी व तत्सम वाहनातून प्रवासी वाहतूक बंद असल्याने या व्यवसायिकांवर संक्रांत आली आहे. प्रवासी वाहतूक बंदमुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्व व्यवसायिक हतबल झाले असून, सर्व व्यवहार पूर्ववत होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

-----------------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक बंद आहे. शेकडो टॅक्सी नाशिकसह अन्य ठिकाणावर जात नाही. त्यामुळे मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. कमी प्रवासी वाहतूक परवडत नाही. त्यामुळे मालक-चालक यांच्यावर संक्रांत आली आहे. यावर काही मार्ग निघावा.- सुनील चांगरे, शहरप्रमुखटॅक्सी चालक-मालक संघटना, मालेगाव

टॅग्स :Nashikनाशिक